Marathi Biodata Maker

दशकपूर्ती सोहळा: घुंगरांच्या नादात गुंफलेला १० वर्षांचा 'नृत्य सरगम कथक'चा दैदिप्यमान प्रवास!

Updated: मंगळवार, 13 जानेवारी 2026 (18:13 IST)
 
कथक लाइव्ह सादरीकरण हा या कार्यक्रमाचा आत्मा होता. लाईव्ह तबला, लाईव्ह लेहरा, पावलांशी संवाद साधणारा नाद—यामुळे कथक फक्त पाहण्याचा नव्हे, तर ऐकण्याचा आणि जाणवण्याचा अनुभव ठरला. प्रत्येक तिहाई संपताना येणारी टाळी ही दाद होती—मनातून उमटलेली.
 
यानंतर बॉलीवूड डान्स परफॉर्मन्स म्हणजे या दशकपूर्तीच्या सोहळ्याला लाभलेली उत्सवी रंगत. कथकाची शिस्त जपूनही आधुनिकतेशी साधलेला संवाद इथे स्पष्ट दिसत होता. अभिव्यक्ती मुक्त होती, चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता आणि प्रत्येक स्टेपमध्ये आत्मविश्वास चमकत होता.
 
हा भाग केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता, “कथक शिकणारी पिढी काळासोबत कशी चालते” याचं सुंदर दर्शन घडवत होता. गुरु शिष्य परंपरेचा एक सुंदर क्षण या कार्यक्रमात अनुभवायला मिळाला. डॉ. सौ. मंजिरी देव यांच्या शिष्या सौ. मनाली मोहिते यांनी अतिशय सुंदर असा धमार ताल सादर केला त्याला देव बाईंनी पढंत  ची साथ केली. कथक नृत्य परंपरेची गुरुशिष्य परंपरा किती सुंदर आणि आश्वासक आहे याचं अलौकिक आहे ते या कार्यक्रमात पहायला मिळालं.
 
पण या सगळ्यांच्या केंद्रस्थानी, या संपूर्ण कार्यक्रमाचा हायलाइट ठरलं ते म्हणजे डॉ. मंजिरी देव यांचं कथक नृत्य सादरीकरण... त्या मंचावर येणं म्हणजे जणू कथकाचं व्यक्तिमत्त्वच चालत येणं.  निखळ साधना  त्यांच्या प्रत्येक पदन्यासात  होती आणि अनुभवाची खोल छाप होती.
घुंगरांचा प्रत्येक नाद बोलका होता.
नजर थांबवत होती.
हात कथा सांगत होते.
त्यांचं नृत्य पाहताना जाणवत होतं—
कथक  केवळ नृत्य नाही, ती एक जीवनदृष्टी आहे.
तालाशी प्रामाणिक राहणं, वेळेचं भान ठेवणं आणि तरीही भावनांना मुक्त सोडणं—हे सगळं त्यांच्या सादरीकरणातून सहज उमटत होतं.
डॉ. मंजिरी देव यांच कथक म्हणजे गंभीरता आणि सौंदर्य यांचा समतोल. त्यांची प्रत्येक हालचाल  गुरू-शिष्य परंपरेला वाहिलेल नम्र नमन होतं. प्रेक्षकांसाठी तो परफॉर्मन्स केवळ दाद देण्याचा नव्हता, तर मन शांत करून पाहण्याचा क्षण होता.
हा सोहळा फक्त भूतकाळाचं सेलिब्रेशन आणि भविष्याकडे नेणारा आश्वासक दृष्टीक्षेप होता. दहा वर्षांची वाटचाल सांगून गेली की नृत्य सरगम कथक क्लासेस  केवळ संस्था नाही, तर एक संस्कारपीठ आहे—जिथे फक्त नृत्य शिकवलं जात नाही, जगणं घडवलं जातं. डॉ. काशीनाथ घाणेकर ऑडिटोरियम, ठाणे येथे आयोजित या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून विदुषी काश्मिरा त्रिवेदी मॅम, आणि कथ्थक एक्सपोनंट डॉ. टीना तांबे या देखील उपस्थित होत्या.
शेवटी, पडदा पडला… टाळ्या थांबल्या…
पण मनात मात्र घुंगरांचा नाद अजूनही घुमत राहिला.
कदाचित म्हणूनच असे सोहळे महत्त्वाचे असतात—
ते क्षणभरासाठी नाही,
तर आयुष्यभरासाठी आपल्या आत काहीतरी उजळवून जातात.
©®वृंदा दाभोलकर

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्र एफडीएने १५ हून अधिक सौंदर्य प्रसाधनांच्या विक्रीवर बंदी घातली

मस्जिद बंदर स्टेशनवर एका प्रवाशाला धावत्या लोकल ट्रेनमधून ढकलून दिल्याचा आरोप मध्य रेल्वेने फेटाळला

नागपुरात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पेंच प्रकल्पातून सिंचनाचे पाणी तात्काळ सोडण्याचे आदेश दिले

iQOO चा 50MP कॅमेरा, 6500mAh बॅटरी फास्ट चार्जिंगसह नवीन 5G फोन लॉन्च

नीट वादाच्या पार्श्वभूमीवर, प्रल्हाद जोशी नवे शिक्षणमंत्री झाले, महत्त्वपूर्ण विधान केले

पुढील लेख
Show comments