संबंधित माहिती
- आरोग्य विद्यापीठातर्फे युक्रेनमधील परतलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांची माहिती संकलनास प्रारंभ
- मालेगांव मॅजिक’ संदर्भात शास्त्रीय संशोधन होणार
- गोरखपूरला फिरायला आलेल्या तरुणाचा पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू, निरीक्षकासह सहा निलंबित
- हृदयद्रावक: हरियाणातील पलवलमध्ये एकाच कुटुंबातील 5 सदस्यांनी आत्महत्या केली, पोलीस या प्रकरणाच्या तपास करत आहे
- नागपुरात पेट्रोल पिऊन विद्यार्थ्याची कॉलेजच्या इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या
Rain Update :या जिल्ह्यांत मुसळधार पावसासह यलो अलर्ट जारी
सध्या राज्यात विविध भागात पावसाची दमदार हजेरी सुरु आहे. राज्यात या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा हवामान खात्यानं शक्यता वर्तवली आहे. मुंबई हवामान केंद्राने शनिवारीही रायगड, पुणे, सातारा, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ येथे मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन यलो अलर्ट जारी केला आहे.14ऑगस्ट रोजी, अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सध्या राज्यातील काही भागात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. राज्यात अतिवृष्टी आणि पुरासारख्या घटनांमध्ये आतापर्यंत 120 जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच 240 जनावरांनाही जीव गमवावा लागला आहे. पावसामुळे 300 हून अधिक गावांचे नुकसान झाले आहे. तसेच 95 जण जखमी झाले आहेत. पुण्यात ,औरंगाबाद,नाशिक, नागपूरात ढगाळ वातावरणाची स्थिती राहण्याची शक्यता आहे.
