बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 29 सप्टेंबर 2021 (11:51 IST)

गोरखपूरला फिरायला आलेल्या तरुणाचा पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू, निरीक्षकासह सहा निलंबित

आपल्या दोन मित्रांसह गोरखपूरला फिरायला आलेल्या कानपूरचा मनीष याचा पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झाला.सोबत आलेल्या मित्रांनी सांगितले की,मध्यरात्री तपासणीच्या नावाखाली खोलीत शिरलेल्या पोलिसांनी त्याला मारहाण केली.मात्र, गोरखपूरचे एसएसपी यांनी याला अपघात म्हटले आहे. एसएसपीच्या म्हणण्यानुसार, घाईघाईत पडल्याने तो जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला.तर रामगढताल परिसरात पोलिसांच्या मारहाणीमुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याप्रकरणी निरीक्षक चौकी प्रभारी फालमंडी आणि चार शिपायांना निलंबित करण्यात आले आहे. संशयितांच्या तपासणीदरम्यान हॉटेलमध्ये घडलेल्या घटनेच्या संदर्भात निष्काळजीपणा केल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. एसएसपीने संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली आणि तपास उत्तर पोलीस अधीक्षक यांच्याकडे सोपवला आहे.
 
 कानपूरमधील जनता नगर बर्रा रहिवासी मनीष हा प्रॉपर्टीचे काम करायचे. सोमवारी सकाळी हरियाणा गुडगावचे हरदीप सिंग आणि प्रदीप गोरखपूरला बाय रोड कारने पोहोचले.त्यांनी तमगडताल भागात असलेल्या हॉटेल कृष्णा पॅलेसमध्ये मुक्काम केला. गोरखपूर सिक्रीगंजच्या महादेव बाजारातील रहिवासी चंदन सैनी आणि इतरांनी त्यांना गोरखपूरला फिरायला बोलावले होते. चंदनने सांगितले की, प्रदीप चौहान (32) आणि हरदीप सिंग चौहान (35) हे मनीष गुप्ता (35) यांच्यासोबत कानपूरहून आले होते. चंदनच्या मते, सर्व मित्र रिअल इस्टेट आणि इतर व्यवसायाशी संबंधित आहेत. फोनवर बोलत असताना तो नेहमी आपल्या मित्रांना गोरखपूरमध्ये होत असलेल्या विकासाबद्दल सांगत असे. बऱ्याच दिवसांपासून त्याची अशी योजना होती की एकदा मी नक्कीच गोरखपूरला भेटायला येईन. लॉकडाऊनमुळे ते आधी येऊ शकले नाही. 
 
तिघांनी गोरखपूरला फिरायला जाण्याची योजना बनवली . हे तिघे सोमवारी आले आणि ते रामगढताल परिसरातील एलआयसी इमारतीजवळ असलेल्या हॉटेल कृष्णा पॅलेसच्या खोली क्रमांक 512 मध्ये थांबले. सोमवारी रात्री 12.30 च्या सुमारास रामगढताल पोलीस तपासणीसाठी हॉटेलमध्ये पोहोचले. इन्स्पेक्टर जे.एन. सिंह, फालमंडी चौकीचे प्रभारी अक्षय मिश्रा वगळता पोलीस ठाण्याचे इतरही  बरोबर होते. हॉटेलच्या खोलीचा दरवाजा ठोठावून उघडण्यात आला. हॉटेलच्या रिसेप्शनिस्टसोबत पोलिसही होते. तपासाचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.आपले सर्व ओळखपत्र दाखवा. 
 
हरदीपने सांगितले की त्याने स्वतःचा आणि त्याचा साथीदार प्रदीप चौहानचा आयडी दाखवला. मनीष झोपलेला असताना. त्याला त्याचा आयडी दाखवण्यासाठी झोपेतून उठवले. त्याने पोलिसांना सांगितले, एवढ्या रात्री हे चेकिंग काय होत आहे. आम्ही दहशतवादी आहोत का? आपण झोपलेल्या व्यक्तीला उठवून त्रास का देत आहात. यावर पोलिसांना राग आला आणि त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. हरदीप म्हणाला की पोलिसांनी आम्हाला दोघांना मारहाण करताना खोलीबाहेर काढले.काही वेळानंतर पोलिसांनी मनीष गुप्ताला बाहेर खेचले आणि त्याला पाहिले,तर तो रक्ताने माखलेला होता. यानंतर पोलिसांनी मनीषला रुग्णालयात नेले.जिथे त्याचा मृत्यू झाला.

मनीष हा त्याच्या आई -वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.
जेव्हा पोलीस पुन्हा आले, तेव्हा सर्वांनी त्यांच्या नावाच्या प्लेट्स काढल्या होत्या. चंदन सैनी यांनी सांगितले की, मयत झालेला मित्र कानपूरचा रहिवासी आहे. या घटनेची माहिती त्याच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे. कुटुंबातील सदस्य गोरखपूरला पोहोचत आहेत. मनीष हा त्याच्या आई -वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.त्याचे लग्न 5 वर्षांपूर्वी झाले होते. कुटुंबातील त्याचे आजारी वडील आणि पत्नी व्यतिरिक्त, त्याला 4 वर्षांचा मुलगा आहे.काही दिवसांपूर्वी आईचे निधन झाले.