Marathi Biodata Maker

हिंदुत्वाबद्दल बोलतात पण महाकुंभाला उपस्थित राहिले नाहीत', असे म्हणत रामदास आठवलेंनी उद्धव ठाकरेंवर सोडले टीकास्त्र

बुधवार, 26 फेब्रुवारी 2025 (21:50 IST)
Mahakumbha News: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी आरोप केला की, शिवसेना युबीटी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी महाकुंभाला उपस्थित न राहून हिंदुत्वाचा अपमान केला आहे तसेच हिंदू मतदारांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकावा. असे देखील ते यावेळी म्हणाले. महाराष्ट्रातील एक प्रमुख दलित नेते आणि भाजपचे सहयोगी आठवले म्हणाले की, ठाकरे हिंदुत्वाबद्दल बोलतात पण प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभाला ते उपस्थित राहिले नाहीत.
ALSO READ: MSRTC बस दुष्कर्म प्रकरणावरून शिवसेना यूबीटी संतप्त, आंदोलकांनी सुरक्षा कार्यालयाची तोडफोड केली
तसेच ते म्हणाले, “ठाकरे यांनी महाकुंभात सहभागी न होऊन हिंदुत्वाचा अपमान केला आहे. हिंदू असणे आणि महाकुंभात सहभागी न होणे हा हिंदूंचा अपमान आहे आणि हिंदूंनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला पाहिजे. लोकांच्या भावना लक्षात घेऊन त्यांनी महाकुंभात सहभागी व्हायला हवे होते, असे केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री म्हणाले. आठवले म्हणाले, “त्यांना नेहमीच हिंदू मते हवी असतात, तरीही त्यांनी महाकुंभात भाग घेतला नाही. "मला वाटतं हिंदू मतदारांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकावा.'' गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा संदर्भ देत ते म्हणाले की, अलिकडच्या निवडणुकीत हिंदू मतदारांनी या नेत्यांना धडा शिकवला आहे.
ALSO READ: हिंदू मतदारांनी बहिष्कार टाकावा, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंवर मोठा हल्लाबोल केला
Edited By- Dhanashri Naik 
ALSO READ: पंजाब सरकारचा मोठा निर्णय, सर्व शाळांमध्ये पंजाबी शिकवणे अनिवार्य

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

उद्धव यांनी रोज रामरक्षा वाचायला हवी… मुख्यमंत्री फडणवीस यांचे उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनाला प्रत्युत्तर

बच्चू कडू यांनी राज्य सरकार कडे राजुरा पुनर्वसन आणि वासनी सिंचन प्रकल्पाचा मुद्दा उपस्थित केला

भारतातील ४५% घरे इलेक्ट्रिक कार चार्जिंगसाठी सुरक्षित नाही

LIVE: वर्ध्यात मुसळधार पावसामुळे हाहाकार, २१ जनावरांचा मृत्यू

मुंबई विमानतळावर ६ कोटी रुपयांचे सोने जप्त, महिला प्रवाशाला अटक

पुढील लेख
Show comments