Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यातील मनपा, जिप निवडणुकांत भाजपा सर्वाधिक जागा जिंकेल – प्रदेशाध्यक्ष दानवे

Updated: शनिवार, 18 फेब्रुवारी 2017 (11:00 IST)
 
महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत भाजपाच्या विरुध्द सारे पक्ष अशी लढाई आहे.  महाराष्ट्राच्या सर्व भागांचा मी दौरा केला असता सर्वत्र भाजपाला अनुकूल वातवरण असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रात नुकत्याच नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. भाजपाला चांगले यश मिळेल असे भाकित आम्ही केले तेव्हा  आमच्या विरोधकांना ही बाब रुचली नव्हती. परंतु सर्वात जास्त म्हणजे 80 नगराध्यक्ष आमचे निवडून आले. या आधी ही संख्या फक्त आठ  होती. तसेच भाजपाचे 1207 नगरसेवक निवडून आले. याआधी हि संख्या 240 होती. दोन ते अडीच वर्षांत भाजपाने यशाचे हे शिखर गाठले आहे. आमचा पक्ष वाढत असल्यानेच विरोधक आमच्यावर तुटून पडत आहेत व अफवा पसरविण्याचे काम त्यांच्यातर्फे सुरू आहे. आमच्यावर जातीयवादी म्हणूनही आरोप केले जात आहेत. शिवसेनेशी आम्ही युती करण्याचा प्रयत्न केला. मात्र ती झाली नाही. त्यांनी आमच्याशी काडीमोड घेतला असेही दानवे पुढे म्हणाले. या आधीच्या केंद्र सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष दिले नाही म्हणून 125 कोटी जनतेने त्या सरकारला खाली खेचले. मात्र भाजपा सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणारे सरकार आहे. आम्ही आणेवारी काढण्याची पद्धत बदलली.  पिकांचे 33 टक्के  नुकसान झाले असले तरी शेतकऱ्यांना भरपाई दिली जाते. पीक विम्याच्या निकषातही बदल केले, असे ही दानवे यांनी निदर्शनास आणले.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

महाराष्ट्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी नवीन प्रशिक्षण धोरण लागू; मंत्री प्रकाश आबितकर यांची घोषणा

इंग्लंडची क्रिकेटपटू केट क्रॉसने निवृत्ती जाहीर केली, १३ वर्षांच्या कारकिर्दीला पूर्णविराम

LIVE: मुंबईचे उपनगरीय रेल्वे नेटवर्क मजबूत करण्यासाठी रेल्वेने मोठे पाऊल उचलले

२३८ नवीन वातानुकूलित लोकल ट्रेन्स तयार होणार! मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कला मोठी चालना, रेल्वेमंत्र्यांची घोषणा

नागपूरचे ऐतिहासिक अंबाझरी तलाव जलपर्णीमुक्त झाले; सुंदर पर्यटन स्थळ बनणार, फडणवीसांनी केला नौकाविहार

पुढील लेख
Show comments