Dharma Sangrah

राष्ट्रवादी काँग्रेसवर ग्रामीण जनतेचा विश्वास...

शनिवार, 25 फेब्रुवारी 2017 (14:54 IST)
गुरुवारी राज्यभरातील महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांचे निकाल जाहीर झाले. या निकालांनुसार ग्रामीण भागातील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर पुन्हा एकदा विश्वास टाकला आहे. जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा नंबर दोनचा पक्ष ठरला आहे. पंचायत समित्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पुणे जिल्ह्यात ७८ जागा मिळाल्या आहेत तर साताऱ्यात ७६, बीडमध्ये ५१, उस्मानाबादेत ५१, अशा एकूण ६७४ जागा मिळाल्या आहेत. जिल्हा परिषदांच्या निकालानुसार पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला ४४, साताऱ्यात ३९, उस्मानाबादेत २६, बीडमध्ये २५, अशा एकूण ३६० जागी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला यश मिळाले आहे.
 
राज्यात झालेल्या निवडणुकांच्या निकालाचे अवलोकन करुन पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगल्या पद्धतीने कार्य करेल. तसेच पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय काँग्रेस व समविचारी पक्ष यांच्या सहकार्याने एकत्रितपणे काम करेल, असे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक  यांनी सांगितले आहे.

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

World Elder Abuse Awareness Day 2026 : जागतिक ज्येष्ठ नागरिक दुर्व्यवहार जागरूकता दिवस

महाराष्ट्रात एकल महिला धोरण तयार करण्याची तयारी सुरू; जनतेच्या पाठिंब्याचे आवाहन

पुण्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; अहिल्यादेवी होळकर योजनेअंतर्गत २,१०२ कोटी रुपयांच्या कर्जमाफीला मंजुरी

अजित पवारांसोबत जे घडले ते शिंदे यांच्यासोबतही घडू शकते; नेते दत्ता मगर असे का म्हणाले?

लातूरमध्ये भरधाव वेगाने जाणाऱ्या क्रेटा कारची क्रूझरला धडक, ३ जणांचा मृत्यू तर १७ जण गंभीर जखमी

पुढील लेख
Show comments