शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 12 सप्टेंबर 2021 (08:31 IST)

पंतप्रधान इंदिरा गांधींना अपात्र ठरवण्याचा निर्णय धाडसी - सरन्यायाधीश

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अपात्र ठरवण्याचा न्यायालयाचा निर्णय हा अत्यंत धाडसी निर्णय होता, असं सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा यांनी म्हटलं आहे.अलाहाबाद हायकोर्टानं 1975 मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अपात्र ठरवण्याचा निर्णय दिला होता. त्यानंतर देशात 2 वर्षांसाठी आणीबाणी लागू करण्यात आली होती, असं रमण्णा म्हणाले.
 
जस्टीस जगमोहन सिन्हा यांनी इंदिरा गांधींना अपात्र ठरवण्याबाबत निर्णय दिला होता आणि हा अत्यंत धाडसी निर्णय होता असं रमणा म्हणाले.
 
निवडणुकीतील गैरप्रकारांप्रकरणी इंदिरा गांधींना दोषी ठरवत त्यांना न्यायालयानं अपात्र ठरवलं होतं. तसंच त्यांना सहा वर्ष कोणतंही पद स्वीकारण्यासही अपात्र ठरवण्यात आलं होतं. त्याचा परिणाम म्हणजे दोन वर्षांची आणीबाणी लावण्यात आली, असंही रमण्णा यांनी सांगितलं.
 
अलाहाबाद उच्च न्यायालयातील नव्या इमारतीच्या पायाभरणी कार्यक्रमात रमणा यांनी हे वक्तव्य केलं. यावेळी उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये होत असलेल्या राष्ट्रीय विधी विद्यापीठाचीदेखील पायाभरणी झाली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीही यावेळी उपस्थिती होती.