Festival Posters

टोल बंद करण्यास आम्ही असमर्थ ,सरकारची कबुली

गुरूवार, 13 जुलै 2017 (14:12 IST)

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेचा टोल बंद करण्यात आम्ही असमर्थ आहोत, अशी स्पष्ट कबुली राज्य सरकारने हायकोर्टात दिली. त्यामुळे एमएसआरडीसीनं यासंदर्भातला निर्णय घ्यावा असं राज्य सरकारनं हायकोर्टात सांगितलं.

यासंदर्भात आरटीआय कार्यकर्ता प्रवीण वाटेगावकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे या रस्त्याच्या उभारणीचा पूर्ण खर्च हा अपेक्षेपेक्षा लवकर पूर्ण झाल्यामुळे, ही टोलवसुली तात्काळ बंद करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.  या याचिकेवर उत्तर देताना राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय की, याबाबतचा करार हा कंत्राटदारासोबत करण्यात आला आहे. ज्यात 2019 पर्यंत टोल वसुलीची मुदत देण्यात आली आहे. तसेच खर्च पूर्ण झाला तरी टोल वसुली मध्येच थांबवण्यात यावी अशा प्रकराचा कोणताही मुद्दा करारात समाविष्ट नाही, असं राज्य सरकारनं हायकोर्टात सांगितलं.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

महाराष्ट्राचे लाडके नेते, विकासाचे शिल्पकार – देवेंद्रजी फडणवीस यांचा आज वाढदिवस!

''प्रशासकीय शिस्त आणि विकासाचा ध्यास घेतलेले लोकनेते – अजित पवार जयंती विशेष''

National Flag Adoption Day 2026 : 22 जुलै 'राष्ट्रीय ध्वज स्वीकार दिन'

मुंबई विमानतळ किंवा रेल्वे स्टेशनसाठीची टॅक्सी रद्द केल्यास पाचपट दंड आकारला जाणार; रक्कम थेट प्रवाशाच्या खात्यात जमा होणार

National Mango Day 2026: राष्ट्रीय आंबा दिवस, महत्त्व आणि भारतीय संस्कृतीतील विशेष स्थान

पुढील लेख
Show comments