संबंधित माहिती
- आज बहुमत चाचणी, सकाळी ११ वाजता हे अधिवशन सुरू होणार
- संजय राऊत यांना ईडीकडून दिलासा, ईडीसमोर हजर होण्यास 14 दिवसाची मुदतवाढ
- आम्ही जी बाळासाहेब आणि शिवसेनेची भूमिका आहे ती पुढे घेऊन जात आहोत :एकनाथशिंदे
- Latest on Maharashtra Political Crisis राजकीय संकटात भाजपने सरकार स्थापनेची कसरत सुरू केली
- गुलाबराव पाटील पुन्हा पानटपरीवर बसतील- संजय राऊत
आपण एक संवेदनशील सुसंस्कृत मुख्यमंत्री गमावला : संजय राऊत
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. फेसबूक लाइव्हच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली. या राजीनाम्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी “आपण एक संवेदनशील सुसंस्कृत मुख्यमंत्री गमावला आहे”, असे म्हटले आहे. ट्विट करत संजय राऊत यांनी आपली भुमिका मांडली.
“मुख्यमंत्री अत्यंत gracefully पायउतार झाले.आपण एक संवेदनशील सुसंस्कृत मुख्यंमंत्री गमावला आहे.दगाबाजीचा अंत चांगला होत नाही असे इतिहास सांगतो. ठाकरे जिंकले जनमानस देखील जिंकले.शिवसेनेच्या भव्य विजयाची ही सुरुवात आहे. लाठ्या खाऊ. तुरुंगात जाऊ. पण बाळासाहेबांची शिवसेना धगधगत ठेऊ!”, असे संजय राऊत यांनी ट्विट केले आहे.
