1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 17 जून 2024 (16:25 IST)

अमोल कीर्तिकरांची जागा आम्ही जिंकली, आदित्य ठाकरेंनी EVM वर प्रश्न उपस्थित केला, कोर्टात जाणार म्हणाले

Aditya Thackeray
सध्या ईव्हीएम वरून वाद होत आहे. एलोन मस्कच्या वक्तव्यांनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. 
काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी ईव्हीएमबाबत वक्तव्य केले होते. ते म्हणाले की, भारतातील ईव्हीएम हे ब्लॅक बॉक्ससारखे आहे, जे तपासता येत नाही.राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले.
 
आता शिवसेनेचे यूबीटी नेते आदित्य ठाकरे यांनीही ईव्हीएमवर वक्तव्य केले आहे. ईव्हीएम नसती तर भाजपला 240 जागा काय तर 40 जागाही जिंकता आल्या नसत्या.असे ते म्हणाले.निवडणूक अधिकाऱ्यांच्या फोनवर वारंवार येणारे कॉल्स आम्ही पाहिले आहेत ज्यामुळे ते वारंवार वॉशरूममध्ये जात होते.
 
रवींद्र वायकर यांचे नातेवाईकांना कोणाचा फोन आला हे आम्हाला माहित आहे. घटनास्थळी उपस्थित निवडणूक अधिकारी गुरव यांच्या मोबाईलवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यावर काल निवडणूक अधिकाऱ्यांनी वक्तव्य दिले. निवडणूक आयोगाने अद्याप सीसीटीव्ही फुटेज आम्हाला दिलेले नाही. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून अमोल कीर्तिकर यांना विजयी घोषित करण्यात यावे, अशी आमची निवडणूक आयोगाकडे मागणी आहे.आम्ही येत्या दोन तीन दिवसांत न्यायालयात जाऊन रवींद्र वायकरांच्या विजयाला आव्हान देत दाद मागू. 
 
आदित्य ठाकरे म्हणाले की, आधी पोस्टल मतपत्रिकांची मोजणी झाल्यानंतर 26 व्या फेरीनंतर ती जाहीर करण्यात आली. मतमोजणीच्या 19व्या फेरीनंतर 26व्या फेरीची मतमोजणी जाहीर करण्यात आली. अमोल कीर्तीकर यांची जागा आम्ही जिंकली असल्याचे ते म्हणाले. आम्ही नक्कीच न्यायालयात जाऊ. 
 
Edited by - Priya Dixit