मंगळवार, 19 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. बजेट 2020-21
Written By

बजेट 2020 Live: लाइव्ह अपडेट्स

अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज, शनिवारी पहिला पूर्ण अर्थसंकल्प मांडणार आहेत. पाहुयात, या अर्थसंकल्पाबाबतचे क्षणोक्षणीचे अपडेट्स...
लडाख विकासासाठी ५ हजार ९०० कोटी
कायद्यानुसार टॅक्स चार्टर लागू करणार
करदात्यांची सरकार काळजी घेणार
पाऱ्यांच्या टॅक्सबाबत न्यायिक भूमिका
टॅक्स चोरी करणाऱ्यांसाठी कडक कायदा
कररचनेसंदर्भात क्लिष्ट कायदे सोपे करणार
बँकेतील ग्राहकांच्या ठेवींच्या नुकसानभरपाईसाठी विम्याची मर्यादा एक लाखावरून पाच लाखांपर्यंत वाढवणार 
सांस्कृतिक मंत्रालयासाठी ३ हजार १०० कोटी
अनुसूचित जाती आणि मागासवर्गीय जातींच्या विकासासाठी ८५ हजार कोटीच्या निधीची तरतूद
अनुसूचित जमातींच्या विकासासाठी ५३,७०० कोटीची तरतूद
ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगासाठी ९५०० कोटींची तरतूद 
अर्थ बजेटचा : कर कायद्यांनध्ये सुधारणा करण्यावर सरकारचा भर, “बॅंकांच्या भरती प्रक्रियांमध्ये सुधारणा करु” - अर्थमंत्री
कर कायद्यामधील सुधारणांवर सरकारचा भर : अर्थमंत्री
- बेटी बचाओ, बेटी पढाओचा चांगला परिणाम
- शाळांमध्ये मुलींची संख्या वाढली
- बेटी बचाओ, बेटी पढाओचं राजकारण नको
- अनुसूचित जाती आणि मागासवर्गीय जातींच्या विकासासाठी ८५ हजार कोटीच्या निधीची तरतूद
- अनुसूचित जमातींच्या विकासासाठी ५३,७०० कोटीची तरतूद
- ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगासाठी ९५०० कोटींची तरतूद 
राष्ट्रीय पोलीस विद्यापीठाची स्थापना करणार - अर्थमंत्री
स्वच्छ भारत योजनेसाठी 12,300 कोटींची तरतूद, ग्रामीण भागाच्या विकासासाठी 1.2 लाखांची तरतूद, जलजीवन योजनेसाठी 11,500 कोटींची तरतूद - अर्थमंत्री
देशाची नवी एज्युकेशन पॉलिसी लवकरच, शिक्षण क्षेत्रातही एफडीआय आणणार, मार्च 2021 पर्यंत डिप्लोमा कोर्सेससाठी दीडशे नव्या संस्था निर्माण करणार
रोजगार देणाऱ्या शिक्षणावर भर देणार, डिप्लोमासाठी 2021 पर्यंत नवीन संस्था उभारणार
शिक्षण क्षेत्रासाठी एडीआय आणणार, शिक्षण क्षेत्रासाठी 99,300 कोटींची तरतूद, कौशल्य विकाससाठी 3 हजार कोटींची तरतूद - अर्थमंत्री
शेती आणि संबंधित क्षेत्रावर पुढच्या आर्थिक वर्षात 2.83 लाख कोटी रुपयांची तरतूद करणार. शेती, सिंचन, ग्राम सुधारणा आणि पंचायती राज यासाठी ही तरतूद.
मिशन इंद्रधनुष योजनेचा विस्तार करणार, आयुष्यमान भारत योजनेत नवीन 20 हजार नवीन रुग्णालयांचं लक्ष्य- अर्थमंत्री
2025 पर्यंत भारत टीबी मुक्त करणार, टीबी हारेगा, भारत जितेगा अभियान राबवणार- अर्थमंत्री
कृषी पंपांना सौर ऊर्जेशी जोडणार,20 लाख शेतकऱ्यांना लाभ
शेतकऱ्यांसाठी 6.11 कोटी विमा योजना
शेतकऱ्यांसाठी 16 कलमी योजना, उत्पन्न दुप्पट करण्याचं ध्येय
शेती आणि संबंधित क्षेत्रावर पुढच्या आर्थिक वर्षात 2.83 लाख कोटी रुपयांची तरतूद करणार. शेती, सिंचन, ग्राम सुधारणा आणि पंचायती राज यासाठी ही तरतूद.
पाण्याची कमतरतेसंबंधित मुद्दे आता देशातील चिंतेचा विषय आहे, पाण्याच्या समस्येचा सामना करणाऱ्या 100 जिल्ह्यांसाठी व्यापक उपाययोजना करण्याचा प्रस्ताव : अर्थमंत्री
दूध उत्पादन 2025 पर्यंत दुप्पट करण्याचं लक्ष्य, दूध उत्पादकांसाठी सरकारकडून खास योजना- अर्थमंत्री
शेतकऱ्यांच्या शेतीमालाची वाहतूक तातडीने व्हावी यासाठी किसान रेल चालवणार. दूध मांस मासे यांच्या वाहतुकीसाठी किसान रेल. हॉर्टिकल्चरमध्ये एक जिल्हा एक उत्पादन अशा समूह योजनांवर भर देणार
मासेमारीला उत्तेजन देण्यासाठी सागर मित्र योजना.. देशातले उत्पादन 200 लाख टन करण्याचे लक्ष्य.
शेतकऱ्यांसाठी 15 लाख कोटींच्या कर्जाची तरतूद- अर्थमंत्री
कृषी उडाण योजनेची सुरुवात करणार, दूध, मांस, भाजीपाला वाहतुकीसाठी रेल्वे सेवा सुरु कारणार - अर्थमंत्री
कृषी क्षेत्रासाठी 16 सूत्रीय अॅक्शन प्लान, 20 लाख शेतकऱ्यांसाठी सोलर पंप योजना, पाणीटंचाई असलेल्या 100 जिल्ह्यांसाठी खास योजना - अर्थमंत्री
अर्थसंकल्प सादर होताच शेअर बाजारात उत्साह, सेन्सेक्समध्ये 113 अंकांची वाढ
20 लाख शेतकऱ्यांना सौरऊर्जेवर चालणारे पंप देणार, देशातले पाणी संकटातले 100 जिल्हे या चिंतेतून मुक्त करणार : अर्थमंत्री
2014-19 मध्ये एफडीआय वाढून 284 बिलियन डॉलरपर्यंत पोहोचला आहे, 2019 मध्ये भारत सरकारचं कर्ज कमी होऊन जीडीपीच्या 48.7 टक्के राहिलं आहे : अर्थमंत्री
2006 ते 2016 या दहा वर्षात देशातील 27 कोटी 10 लाख जनतेला दारिद्र्यरेषेच्या वर आणण्यात यश : अर्थमंत्री
हमारा वतन खिलते शालीमार जैसा, हमारा वतन डल झील में खिलते कमल जैसा, नौजवानो के गरम खून जैसा, मेरा वतन...तेरा वतन... दुनिया का सबसे प्यारा हमारा वतन : अर्थमंत्री
अर्थसंकल्प देशाच्या इच्छा पूर्ण करणारा - सीतारमन 
जीएसटी ऐतिहासिक पाऊल 
माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांना श्रद्धांजली
संसदेत अर्थसंकल्प वाचनास सुरुवात 
कॅबिनेटच्या बैठकीत अर्थसंकल्पाला मंजुरी 
जानेवारी महिन्यात 1,10,828 कोटी सरकारी तिजो‍रीत जमा झाले आहेत. 
इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी काल लोकसभेत आर्थिक सर्व्हे 2020 (Economic survey 2020 loksabha) मांडला. या बजेटमध्ये इन्कम टॅक्समधून कर्मचारी वर्गाला दिलासा मिळू (Economic survey 2020 loksabha) शकतो.
सध्या इन्कम टॅक्समध्ये तीन स्लॅब आहे. यामध्ये 2.5 ते 5 लाख पर्यंतच्या उत्पन्नावर 5 टक्के आयकर लागतो. तर 5-10 लाख उत्पन्नावर 20 टक्के टॅक्स द्यावा लागतो. तर 10 लाखांच्या वर असलेल्या उत्पन्नावर 30 टक्के टॅक्स लावला जातो. येणाऱ्या बजेटमध्ये 10 लाखांच्या उत्पन्नावर मोठी सूट मिळू शकते. दहा लाख उत्पन्न गटातील नोकरदारांसाठी 10 टक्क्यांचा नवा स्लॅब येऊ शकतो, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी शेअर बाजारात घसरण
प्री-ओपनिंगला शेअर बाजारा 100 अंकांनी कोसळला
अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थमंत्रालयात दाखल
केद्रीय अर्थसंकल्प असल्याने मुंबई शेअर बाजार शनिवार सुरूच राहणार आहे