suvichar

अजित पवार आम्हाला साथ देत नाहीत - यशोमती ठाकूर यांचा आरोप

Updated: रविवार, 22 ऑगस्ट 2021 (17:32 IST)
 
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात आयोजित अन्यायग्रस्त शेतकरी संवाद कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
यावेळी बोलताना यशोमती ठाकूर यांनी म्हटलं, "बालसंगोपनाचे पैसे कित्येक वर्षांपासून वाढलेले नव्हते. त्यांना 450 रुपये मिळत होते. आपण काही काळापूर्वी 1125 रुपये केले आहेत. पण माझी अशी इच्छा आहे की, किमान त्यांना कमीतकमी 2500 रुपये त्या लेकरांना द्यायला हवे. तसा प्रस्ताव आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे आम्ही पाठवलेला आहे."
यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे बघत त्या पुढे म्हणाल्या, "उपमुख्यमंत्री साहेब आम्हाला जशी पाहिजे तशी साथ देत नाहीयेत. तुम्ही जोर लावला तर ती साथ मिळेल."
महाविकास आघाडी सरकारमध्ये डावललं जात असल्याचं काँग्रेस नेत्यांनी बोलून दाखवलं आहे. त्यातच आता यशोमती ठाकूर यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
 
याविषयी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बाजू जाणून घेतली.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, "यशोमती ठाकूर यांनी हे वक्तव्य मिश्किल पद्धतीनं केलं आहे. त्याला फार गांभीर्यानं घेण्याची गरज नाही.
 
"कोरोनामुळे राज्याच्या वित्त विभागाची अवस्था काही कुणापासून लपून राहिलेली नाही. ही अवस्था जशी सुधारेल तसं त्यांनी पाठवलेल्या प्रस्तावावर विभाग विचार करेल."

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments