Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Satish Kaushik कॉमेडियन होण्यासाठी आले अन् दिग्दर्शकही बनले..

Updated: गुरूवार, 9 मार्च 2023 (14:20 IST)
 
अनिल कपूर आणि श्रीदेवी यांना सोबत घेऊन सतीश कौशिक यांनी रूप की रानी, चोरों का राजा हा चित्रपट काढला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष चालला नव्हता.
 
काही वर्षांनंतर आलेले हम आपके दिल में रहते है, हमारा दिल आपके पास है हे चित्रपट गाजले होते. तुषार कपूर आणि करीना कपूर यांना सोबत घेऊन त्यांनी मुझे कुछ कहना है चित्रपट काढला.
 
त्यांचा दिग्दर्शक म्हणून सर्वाधिक गाजलेला चित्रपट हा तेरे नाम ठरला. सलमान खानने अभिनय केलेल्या या चित्रपटाची इतकी क्रेझ निर्माण झाली होती की अनेक तरुण सलमान खानप्रमाणे केशभूषा करू लागले होते.
 
पंकज त्रिपाठी यांच्यासोबतचा कागज हा त्यांचा शेवटचा प्रदर्शित चित्रपट ठरला.
 
काही दिवसांपूर्वीच सतिश कौशिक यांनी एक फोटो ट्वीट केला होता. मुंबईत पहिल्यांदा आल्यावरचा हा फोटो होता.
 
9 ऑगस्ट 2022 ला त्यांनी हा फोटो ट्वीट केला होता. त्यात ते म्हणाले होते की, '43 वर्षांपूर्वी मी या शहरात आलो आणि या शहराने प्रेमाने मला कुशीत घेतलं आणि कधीच दूर होऊ दिलं नाही. असंच प्रेम करत राहा आणि शक्ती देत राहा. अजून अनेक स्वप्नं बाकी आहेत.'
बीबीसी हिंदी प्रतिनिधी, नितीन श्रीवास्तव यांनी सांगितलेल्या आठवणी
सतीश कौशिक यांच्याशी बीबीसी हिंदीचे प्रतिनिधी नितीन श्रीवास्तव यांनी 18 वर्षांपूर्वी मुलाखत घेतली होती. त्यावेळच्या आठवणी त्यांनी सांगितल्या.
 
नितीन श्रीवास्तव यांनी सांगितल्या आठवणी
 
2005 मध्ये वादा हा चित्रपट रिलीज होणार होता. त्याआधी दोनच वर्षांपूर्वी त्यांनी दिग्दर्शित केलेला तेरे नाम हा चित्रपट आला होता.
 
त्यावेळी मी स्टार न्यूजसाठी ज्युनिअर रिपोर्टरचे काम करत होतो आणि माझं पोस्टिंग मुंबईत होतं. त्या दिवशी मला सतीश कौशिक यांची मुलाखत घेण्याचे सांगण्यात आले.
 
मुंबईच्या जुहू भागात त्यांच्या कार्यालयात भेटण्यासाठी जायचं होतं. मिस्टर इंडियाच्या कॅलेंडरला आपण भेटणार यामुळे मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या.
 
दुपारी एकच्या सुमारास त्यांच्या कार्यालयात पोहोचलो, रिसेप्शनवर उभा असताना माझ्यासमोरच एक जण मुंबईतील प्रसिद्ध तिवारी स्वीट्सचे पार्सल घेऊन कौशिक यांच्या कॅबिनमध्ये जाताना दिसला.
 
जेव्हा मी आत गेलो तेव्हा त्यांनी सर्वांत आधी म्हटलं की बेटा, आधी काहीतरी खाऊन घे तू. गप्पा गोष्टी तर आरामात होतच राहतील.
 
सतीश कौशिक आरामात खस्ता आणि कचौरीचा आनंद लुटत होते. काही बोलणं सुरू करण्याच्या आतच ते म्हणाले, आम्ही तर पंजाब-दिल्लीवाले आहोत. इथे मुंबईत सुद्धा तसंच जेवण शोधत हिंडतो.
 
जेव्हा मी दिल्लीतल्या किरोडीमल कॉलेजमध्ये शिकत होतो तेव्हा दर आठवड्याला करोलबागेतील रौशन दी कुल्फी खाण्यासाठी बसने जात होतो. तिथेच चना-भटुरा खायचो. काय चव होती यार ती. असं म्हणत ते आपल्या जुन्या आठवणीत रमले.
 
कॉमेडियन बनण्यासाठी आले आणि दिग्दर्शकही बनले
सतीश कौशिक यांना जाने भी दो यारो या चित्रपटातील संवाद लेखनाचा पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या कार्यालयात वैष्णोदेवीची प्रतिमा होती, त्याच्या पाठीमागे तेरे नामचे पोस्टर आणि जाने भी दो यारोंसाठी जिंकलेली ट्रॉफी होती.
 
त्याबद्दल सतीश कौशिक सांगू लागले, जेव्हा मी जाने भी दो यारोंचे संवाद लिहिले तेव्हा वाटलं देखील नव्हतं की पुढे जाऊन हा चित्रपट कल्ट क्लासिक होईल. आम्ही तेच करण्याचा प्रयत्न करत होतो जे आम्ही एनएसडी आणि FTII मध्ये शिकलो होतो.
मला आठवतं मी त्यांना म्हटलो की सर मी मिस्टर इंडिया सहा-सात वेळा पाहिला आहे. त्यातली तुमची आणि मोगॅम्बोची व्यक्तिरेखा अतिशय जबरदस्त वाटले.
 
त्यावर तो हसत हसत म्हणाले, यार मी तर फक्त तेच करत होतो जे सलीम-जावेद साहेबांनी लिहून दिलं आहे. तसं पाहायला गेलो तर मी इंडस्ट्रीत कॉमेडियन होण्यासाठीच आलो होतो. माझ्यावर जॉनी वॉकर आणि मेहमूद यांचा प्रभाव होता. मला ते फार आवडायचे. आणि मनात एक विश्वास होता की यांच्याप्रमाणेच मी देखील लोकांना हसवू शकतो. दिग्दर्शक तर मी नंतर बनलो पण माझं पहिलं प्रेम हे कॉमेडीच आहे मित्रा.
 
मिस्टर इंडियाचं लेखन हा सलीम-जावेद यांचा शेवटचा एकत्रित प्रकल्प होता. त्यांनंतर ते एकमेकांपासून दुरावले. हे जरी खरं असलं तरी त्यांनी तयार केलेली पात्रं ही अजरामर ठरली आणि त्यातलं एक पात्र कौशिक यांनी साकारलेलं 'कॅलेंडर' हे देखील होतं.
 
खाण्या-पिण्यावर त्यांचं प्रचंड प्रेम होतं
सतीश कौशिक थोड्या-थोड्या वेळानंतर दिल्लीतल्या दिवसांबद्दल बोलत असत. त्यांना जेव्हा कळलं की माझं शिक्षण देखील दिल्लीतच झालं आहे तेव्हा ते म्हणाले 'खाण्या-पिण्याची आवड आहे का'?.
 
मी म्हटलं, 'हो आहे ना'.
 
त्यावर ते म्हणाले, 'तर मग सांग मला तुझी आवडती खाण्या-पिण्याची पाच ठिकाणं कोणती?'
 
मी काही सांगणार त्याआधीच ते बोलू लागले.
 
'अरे राहू दे, मी काय सांगतो ते ऐक. मी जेव्हा NSD मध्ये शिकत होतो तेव्हा आम्ही पुरानी दिल्ली किंवा पहाडगंज येथून जेवण मागवत असू. काय जेवण होतं यार ते. त्यात वरतून ते साजूक तूप टाकत असत. अहाहा! आज ही कधी संधी मिळते तर दिल्लीतून जेवण मागवून खातो मी. आता हे नको म्हणू की माझं वजन त्यामुळेच वाढलं,' आणि असं म्हणत ते दिलखुलास हसू लागले.
 
त्यानंतर त्यांना मी तीन वेळ भेटलो आणि तिन्ही वेळी ही भेट दिल्लीच्या विमानतळावरच झाली.
 
गेल्या वर्षीच त्यांना मी भेटलो तेव्हा मी त्यांना वादा चित्रपटावेळी झालेल्या भेटीची आठवण करुन दिली. त्यावर ते म्हणाले, 'जाऊ दे रे ते आता. विचार करतोय की तेरे नाम-2 बनवावा. दिल्लीतही शूट करता येईल. मजा येईल.'
 
त्यांचं दिल्लीवर जीवापाड प्रेम होतं आणि नियती अशी की अखेरचा श्वासही त्यांनी दिल्लीतच घेतला.

सर्व पहा

विकी जैनने वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी 'व्हीजे फ्रेम्स' या प्रॉडक्शन हाऊसची भव्य सुरुवात केली

यशने रावणाची भूमिका साकारण्यामागचे रहस्य उघड केले

११ ऑगस्ट रोजी ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर, 'मिर्झापूर: द मुव्ही' ७-८ शहरांमध्ये भव्य प्रमोशन करणार

अभिनेत्रीला सायबर भामट्यांनी लावला 2 लाखांचा चुना

बिर्याणी खात खात सलमानने केली हेअर ट्रीटमेंट! निर्माते शैलेंद्र सिंह यांचा खुलासा

सर्व पहा

एल्विश यादवची बॉलिवूडमध्ये मोठी झेप, रितेश-परेश-राजपालसोबत 'मालामाल वीकली 2'मध्ये दिसणार

अत्यंत गूढ, निसर्गरम्य आणि पवित्र नैसर्गिक चुनखडीची गुहा; पाताल भुवनेश्वर पिथौरागढ उत्तराखंड

मुंबई उच्च न्यायालयाने संजय दत्तच्या पुण्यातील 'बल्लर' या नाईटक्लबमध्ये परवाना नसलेल्या संगीतावर बंदी घातली

प्रियंका चोप्राने श्रीदेवीच्या जयंतीनिमित्त दिले सरप्राईज; 'एम्प्रेस' या त्यांच्या आत्मचरित्राचे मुखपृष्ठ प्रदर्शित

लोकप्रिय गोपी बहू, जिया मानेक आता 'बिग बॉस २०' च्या घरात एन्ट्री करणार!

पुढील लेख
Show comments