Marathi Biodata Maker

’तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत एक नवी एन्ट्री झाली आहे

गुरूवार, 7 जुलै 2022 (14:43 IST)
मुंबई : तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही प्रेक्षकांची आवडती मालिका. पण सध्या मात्र चर्चा आहे ती या मालिकेतील कलाकारांच्या येण्या आणि जाण्याने होय, मालिकेतून दयाबेन दीर्घकाळापासून गायब आहेच. त्यानंतर गेल्या काही महिन्यांत अनेक कलाकारांनी मालिकेला बाय बाय केला आहे. तारक मेहता ही भूमिका साकारणारे अभिनेते शैलेश लोढा यांनी काही दिवसांपूर्वी हा शो सोडला आहे.
 
आता टप्पूची भूमिका साकारणाऱ्या राज यानेही मालिका सोडल्याची चर्चा रंगली आहे. याबद्दल निर्मात्यांनी अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. पण हो, आता मालिकेत एक नवी एन्ट्री झाली आहे आणि ही एन्ट्री टप्पूची रिप्लेसमेंट असल्याचे मानले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून मालिकेतील टप्पू गायब आहे.
 
टप्पू हा मुंबईच्या बाहेर शिक्षण घेण्यासाठी गेला आहे, असं या मालिकेमध्ये दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे टप्पू ही भूमिका साकारणाऱ्या राजने ही मालिका सोडली आहे, असं म्हटले जात आहे. त्याची जागा बिट्टूने घेतल्याची चर्चा आहे. टप्पूची भूमिका साकारणारा राज 2017 पासून मालिकेत काम करतोय. या आधी अभिनेता भव्य गांधी या मालिकेत टप्पू साकारत होता.
 
भव्य गांधी एक भारतीय टेलिव्हिजन अभिनेता आणि बालकलाकार आहे. 2008 मध्ये तारक मेहता का उल्टा चष्मा या नाटकातून त्यांनी बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात केली. ज्यामध्ये त्याने “दीपेंद्र जेठालाल गडा” उर्फ “टप्पू” ची भूमिका साकारली होती. भव्य गांधी यांचा जन्म 20 जून 1997 रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे झाला. त्यांचे वडील विनोद गांधी हे व्यापारी होते. अलीकडे 2020 मध्ये वडिलांच्या निधन झाले आहे. सध्या तो आई आणि मोठ्या भावासोबत मुंबईत राहतो.

सर्व पहा

धर्मेंद्र यांच्या बायोपिकमध्ये मुख्य अभिनेता कोण साकारणार?बॉबी देओलने हे उत्तर दिले

खिशाला कात्री न लावता सरकारी बजेट पॅकेजेसमध्ये फॅमिलीसोबत सुरक्षितपणे फिरून या

चित्रपट महामंडळाला स्थिर आणि कृतिशील कार्यकारिणी देण्याची समर्थ पॅनलची ग्वाही

रणवीर सिंगने एफडब्ल्यूआयसीई (FWICE) बंदीविरोधात न्यायालयात धाव घेतली, कायदेशीर नोटीस पाठवली

'दुसरा राम कोणालाही बघायचा नाही', रामायणममधील रणबीर कपूरच्या कास्टिंगच्या वादावर अरुण गोविल यांचे मोठे विधान

सर्व पहा

हरियाणवी गायक आणि विनोदी कलाकार पेप्सी शर्मा यांचे वयाच्या ३८ व्या वर्षी निधन

मराठी चित्रपट 'तिघी' आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकला, न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार पटकावला

राखी गुलजार यांनी आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाला पाठिंबा दिला; म्हणाल्या-"वयाच्या ६० व्या वर्षी लग्न करण्यात काय अडचण?"

Coconut Island in India भारतातील रहस्यमय 'कोकोनट आयर्लंड' नक्कीच भेट द्या

टीव्ही क्वीन' एकता कपूर वयाच्या ५१ व्या वर्षीही अविवाहित आहे, वडिलांच्या एका अटीने तिचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकले

पुढील लेख
Show comments