Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अक्षय खन्नाने लग्न का केले नाही? लग्नच करायचं नाही हे ठरवण्यामागील कारण आहे तरी काय?

Updated: मंगळवार, 9 डिसेंबर 2025 (17:58 IST)
 
लग्न न करण्यामागची मुख्य कारणं (अक्षय खन्नांच्या शब्दात) सांगायची झाली तर 
"मी लग्नाचा मटेरियलच नाही"
अक्षयचे म्हणे आहे की, "मी माझ्या आयुष्यावर 100% कंट्रोल ठेवू इच्छितो. लग्न केलं की मला माझं आयुष्य, वेळ, निर्णय सगळं कोणाशी तरी शेअर करावं लागेल. मी त्यासाठी तयार नाही."
 
एकटेपणा आवडतो
अक्षयला एकांत खूप आवडतो. "मी फक्त स्वतःचाच जबाबदार राहिलो तरी चालेल. पत्नी-मुलांचा विचार करायची मला गरज नाही." अक्षयने अगदी ठामपणे सांगितलंय की, "मला आयुष्यात कधीही मूल नको आहे. मुलं झाली की आयुष्य पूर्णपणे बदलतं, ती जबाबदारी मी घेऊ शकत नाही."
 
कमिटमेंट फोबिया
पूर्वी अक्षय रोमँटिक होता. 90 च्या दशकात करिश्मा कपूरसोबत त्याचं खूप सीरियस रिलेशनशिप होतं. दोघांची लग्नं ठरली होती, रणधीर कपूरांनी विनोद खन्नांकडे प्रपोजलही पाठवलं होतं. पण बबीता कपूरांनी करिश्माची करिअर पीकवर असताना लग्नाला नकार दिला आणि ते रिलेशनशिप तुटलं. 
त्या ब्रेकअपनंतर अक्षय पूर्णपणे कमिटमेंटपासून दूर गेला. 
 
आता तर ठरवलंचय की लग्नच करायचं नाही
आता वयाच्या 50 व्या वर्षीही अक्षयचे म्हणणे आहे की, "आता तर मला लग्नाची गरजच वाटत नाही. मी माझ्या आयुष्यात अगदी खुश आहे. लग्न करणं ही माझी प्राथमिकता कधीच नव्हती आणि यापुढेही नाही."
 
थोडक्यात, अक्षय खन्ना यांनी पैसा, प्रसिद्धी, फॅन फॉलोइंग असूनही स्वतःच्या सुखासाठी आणि स्वातंत्र्य आणि एकटेपणा निवडला. त्यांचं हे मत खूप स्पष्ट आणि ठाम आहे. त्यामुळेच आजही ते आनंदाने सिंगल आहेत आणि "छावा", "धुरंधर" सारख्या मोठ्या सिनेमांमध्ये आपल्या भूमिकेमुळे प्रेक्षकांना वेड लावत आहे!

सर्व पहा

कबीर खानच्या चित्रपटाच्या सेटवर कार्तिक आर्यन जखमी, गुडघ्याच्या शस्त्रक्रिया होणार

कार्तिक आर्यनने स्वतःची निर्मिती संस्था, डोपामाइन स्टुडिओ सुरू केली

विमल वेलचीच्या जाहिरातीवरून मुकेश खन्ना संतापले, शाहरुख आणि अजय देवगण यांना माफी मागण्यास सांगितले

राजपाल यादवने ₹१,२०० कोटी किमतीचा करार केला; अभिनेता १२ चित्रपटांमध्ये काम करणार

अभिनेता रणवीर सिंग ने 'प्रलय'च्या चित्रीकरणाला सुरुवात केली

सर्व पहा

पद्मश्री पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ अभिनेत्री सौकार जानकी यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन

मराठी अभिनेत्री वनिता खरात एका मोठ्या ऑनलाइन घोटाळ्याची बळी ठरली

हिंदू-मुस्लिम विचारसरणीतून बाहेर पडा...'; शर्मिला टागोर यांच्या 'वंदे मातरम' वक्तव्यावर कंगना रणौतचा घणाघात!

गोविंदाला 'चिची' हे नाव कसे मिळाले? याचे कारण खुद्द सुनीता आहुजा यांनी स्पष्ट केले, जुने वक्तव्य समोर आले

Gopinath Temple Uttarakhand महादेवाचे असे मंदिर! जिथे शिवाने गोपींचे रूप घेतले होते

पुढील लेख
Show comments