Festival Posters

Book Review - पुस्तक परिचय

Updated: शुक्रवार, 15 एप्रिल 2016 (10:47 IST)
 
आयुष्याच्या या प्रवासात
अशाही अनेक परिक्षा येतात
कितीही अभ्यास केला तरी
हमखास नापास करून जातात.
 
आयुष्य म्हणजे एक पुस्तक आहे, त्यामध्ये सुख-दुःखाची अनेक पाने असतात. तसेच यश-अपयश हे सुद्धा भरलेले असते. कोणत्याही व्यक्तीला आयुष्य जगत असताना दररोज एक नवीन धडा अभ्यासावा लागतो. दुःखाचं किंवा अपयशाचं एखादं पानं आलं म्हणून पुस्तक फेकून द्यायचं नसतं. तर ते पान पलटून पुन्हा खंबीरपणे उभा रहायचं असतं. जीवन ही एक शाळा म्हणता येईल ही शाळा शिकत असताना प्रत्येक व्यक्ती कोणत्या इयत्तेमध्ये शिकत आहे किंवा पुढे कोणता पेपर आहे हे कोणालाही सांगता येत नाही त्यासाठी प्रत्येक परीक्षेला सामोरे जाणारा व्यक्ती नेहमी यशस्वी होतो.
 
नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे, आवडलेलं आणि निवडलेलं याची जेव्हा सांगड घालता येत नाही तेव्हा आयुष्यात उरतेती फक्त तडजोड कारण आवडलेलं कधी आपल्याला विसरता येत नाही आणि निवडलेलं मनापासून स्वीकारता येत नाही.
 
अनेक व्यक्ती ह्या देवा समोर भिकार्‍यासारखी भिक मागताना आपण पाहतो आणि देवळाच्या बाहेर जे भिकारी बसलेले असतात त्यांच्या समोर स्वतः देव असल्याचा अहंकार मनी बाळगत असतात.
 
कवी तेजाकांत यांनी दिस सुर्याजीचा या कवितेमध्ये खुपचं छान पद्धतीने प्रत्येक व्यक्तीची दिनचर्या लिहिली आहे. अगदी साध्या आणि सोप्या शब्दांमध्ये संपूर्ण दिवस सामावून घेतला आहे. जीवन जगत असताना कोणत्याही कठीण प्रसंगी एकच वाक्य सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे ते म्हणजे हार कधीच मानणार नाही मी हे वाक्य प्रत्येक क्षणोक्षणी मनात ज्वलंत ठेवा यश नक्कीच मिळेल.
 
या धावपळीच्या जीवनामध्ये नक्की कोठे थांबायचं आहे हेच अनेकांना माहित नसते किंवा ज्यांच्यासाठी आपण ही धावपळ करत आहे, त्यांना आपण आनंद देवू शकलो नाही तर ही होणारी धावपळ व्यर्थ आहे असे समजले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीच्या मनातील अनेक प्रश्‍नांची उत्तरे तसेच समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्याचे काम मन पारंब्या या कवितासंग्रहातून नक्की मिळतील प्रत्येकाने हा कवितासंग्रह जरूर वाचावा.
 
- मंगेश विठ्ठल कोळी (ज्येष्ठ समीक्षक)

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

Guru Purnima Wishes for Swami Samarth श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी समर्पित गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

स्पायसी चटपटीत चिली गार्लिक टोमॅटो मॅगी; नेहमीच्या मॅगीला एक मस्त ढाबा-स्टाईल ट्विस्ट

सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे पाणी पिण्याचे फायदे, दुष्परिणाम जाणून घ्या

विमानतळावर सरकारी नोकरीची संधी, पात्रता ,पगार, संपूर्ण माहिती जाणून घ्या

पावसात भिजल्यानंतर तुमच्या त्वचेला खाज सुटते का, या टिप्स अवलंबवा

Show comments