Festival Posters

एका दिवसात उच्चांकी रूग्णांना कोरोनामुक्ती

रविवार, 17 मे 2020 (08:28 IST)
देशात शनिवारी पहिल्यांदाच एका दिवसात उच्चांकी २ हजारांहून अधिक जणांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनूसार गेल्या एका दिवसात २ हजार २३३ कोरोनामुक्त नागरिकांना विविध राज्यातील रूग्णालयातून सुटी देण्यात आली. चिंताजनक बाब म्हणजे एका दिवसात ३ हजार ९७० नवीन संसर्गग्रस्तांची भर पडली आहे. तर, १०३ जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक संसर्गग्रस्त दिल्ली, तामिळनाडू, गुजरात तसेच महाराष्ट्रात आढळून आले आहेत. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा त्यामुळे ८५ हजार ९४० झाला आहे. 
 
आतापर्यंत ३० हजार १५३ जणांनी कोरोनावर मात मिळवली आहे. तर २ हजार ७५२ रूग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. कोरोनामुक्तीचा दर वेगाने वाढत आहे. सध्या हा दर ३५ टक्क्यांच्या घरात आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) आतापर्यंत देशात २१.३४ लाख वैद्यकीय तपासण्या केल्या आहेत.
 
कोरोना संसर्गासंबंधी देशातील पाच मोठ्या राज्यातील स्थिती चिंताजनक आहे. या राज्यातील कोरोनामुक्त तसेच कोरोनाबाधितांच्या मृत्यूच्या प्रमाणाकडे दृष्टिक्षेप टाकल्यास पश्चिम बंगाल मधील स्थिती बिकट असल्याचे दिसून येत आहे. दर एका कोरोनाबाधितांच्या मृत्यू मागे ३.६ रूग्ण कोरोनामुक्त होत असल्याचे दिसून आले आहे. तर, महाराष्ट्रात दर एका कोरोनाबाधितांच्या मृत्यू मागे हे प्रमाण ५.९ एवढे आहे. गुजरातमध्ये ६.४, पंजाबमध्ये ७ तर मध्य प्रदेशात  हे प्रमाण ९.२ एवढे आहे. 
 
आरोग्य मंत्रालयानुसार पश्चिम बंगालमध्ये कोरोना संसर्गाचा मृत्यूदरही सर्वाधिक आहे. देशातील सर्वात जास्त मृत्यूदर ९.१४ पश्चिम बंगालमध्ये नोंदवण्यात आला आहे. शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळ समुहाच्या बैठकीत संसर्गग्रस्तांना योग्य सुविधा उपलब्ध करवून देण्याचे निर्देश त्यामुळे राज्याला देण्यात आले होते. बंगाल खालोखाल मेघालयात ७.६९, पॉडिचेरी ७.६९, गुजरात ६.१०, मध्य प्रदेश ५.२० , हिमाचल प्रदेश ३.९५, महाराष्ट्रात ३.६७, तर कर्नाटक मध्ये ३.४१ मृत्यूदर नोंदवण्यात आला आहे. 
 
देशातील कोरोनासंबंधीची आकडेवारी  
एकूण रूग्ण  -  ८५ हजार ९४०  
सक्रिय केस  -   ५३ हजार ३५0
कोरोनामुक्त -   ३० हजार १५२
मृत्यू   -    २ हजार ७५२

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

उद्धव यांनी रोज रामरक्षा वाचायला हवी… मुख्यमंत्री फडणवीस यांचे उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनाला प्रत्युत्तर

बच्चू कडू यांनी राज्य सरकार कडे राजुरा पुनर्वसन आणि वासनी सिंचन प्रकल्पाचा मुद्दा उपस्थित केला

भारतातील ४५% घरे इलेक्ट्रिक कार चार्जिंगसाठी सुरक्षित नाही

LIVE: वर्ध्यात मुसळधार पावसामुळे हाहाकार, २१ जनावरांचा मृत्यू

मुंबई विमानतळावर ६ कोटी रुपयांचे सोने जप्त, महिला प्रवाशाला अटक

पुढील लेख
Show comments