Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाऊबंदकीचे दिवस

Updated: शुक्रवार, 4 एप्रिल 2014 (15:37 IST)
इथे मर्‍हाटी मुलुखात दोन भावांमध्ये राजकीय साठमारी सुरू असतानाच दिल्लीच्या जामा मशिदीचे इमाम आणि त्यांच्या बंधूंमध्येही काँग्रेसपक्षाला लोकसभा निवडणुकीत पाठिंबाचा फतवा जारी करण्यावरून वाद उफाळून आले आहेत. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया  गांधी आणि जामा मशिदचे इमाम सय्यद अहमद बुखारी यांच्या भेटीवर टीकेची झोड उठविली आहे. इमामांचे धाकटे बंधू सय्यद याह्या बुखारी यांनी काँग्रेस पक्षाध्क्षांच्या घरी जाऊन भेटाची इमामांना काय गरज होती? असा सवाल केला आहे. इमामांच्या भाऊबंदकीनेही देशातील मुस्लीम समाजात संभ्रम निर्माण होऊ पाहात आहे. देशाची राज्यघटना जरी धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करत असली तरी भारतामध्ये धर्म ही बाब मते मागण्याचे आणि निवडून येण्याचे साधन ठरत आली आहे. आजही त्यात मुळीच बदल होताना, घडताना दिसत नाही, ही भारतीय जनतेची आणि आपल्या लोकशाहीचीच शोकांतिका म्हटली पाहिजे.

मराठी मुलुखाला भाऊबंदकीचा शाप असल्याचा शिवपूर्वकाळापासूनचा इतिहास आहे. ठाकरे बंधूंमधील उफाळलेला वाद आता शिवसैनिक आणि मनसैनिकांसाठी मुंबईत राडेबाजीला कारण ठरताना दिसतोय. गेल्या काही दिवसांपासून मराठी संस्कृतीचा अभिमान नव्हे तर गर्व बाळगणार्‍यांकडून औकात, खंजीर अशा ऐतिहासिक कादंबर्‍यात शोभणार्‍या शब्दांचा स्वैरपणे वापर घडत आहे. मनसे म्हणजे काँग्रेसने रचलेला राजकीय सापळा असल्याची उद्धव यांची कडवट टीका राज यांना न झोंबती तरच नवल ! त्यात पुन्हा शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचा मुद्दाही आता राजकीय बनू पाहात आहे. तिकडे तमिळनाडू राज्यातही तमिळ अस्मितेचे राजकारण करणार्‍या ‘द्रविड मुन्नेत्र कळघम’ या एम. करुणानिधी यांच्या पक्षातही भाऊबंदकीला तोंड फुटले आहे. राजकारण आणि सत्ताकारण ही अशी क्षेत्रे आहेत की, तिथे कुणाच महत्त्वाकांक्षा कधी टोकदार होतील याचा नेम नाही. मग तो वाद ठाकरे बंधूंसारख्या एका घराणतला असो किंवा करुणानिधी पुत्रांमधील असो अथवा धार्मिक राजकारणात मुरलेल्या जामा मशिदीच्या इमाम बंधूंतील असो. लोकसभा निवडणुकीच्या वातावरणात देशात मात्र राजकीय भाऊबंदकीचे दिवस पुन्हा उफाळून आले आहेत. 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नागपूरमध्ये स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ, महानगरपालिकेने सतर्कतेचा इशारा दिला!

एअर इंडियाची मोठी घोषणा, मुंबई-टोरोंटो थेट विमानसेवा २५ ऑक्टोबरपासून सुरू होणार

LIVE: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसने सोडले टीकास्त्र

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसने सोडले टीकास्त्र , राष्ट्रवादी काँग्रेसने दिले प्रत्युत्तर

सीएसएमटी आणि सावंतवाडी दरम्यान नवीन नियमित रेल्वेगाडी धावणार

Show comments