Festival Posters

भारतातील 5 प्रसिद्ध खाद्यपदार्थ

Updated: रविवार, 7 ऑगस्ट 2022 (18:42 IST)
 
वडा पाव
वडा पाव हे मुंबईचे प्रसिद्ध खाद्य आहे, पण हळूहळू ते संपूर्ण भारतातील प्रसिद्ध स्ट्रीट फूड बनले आहे. वडापावची फेरफटका मुंबई व्यतिरिक्त इतर शहरातही पाहायला मिळेल. वडा पावमध्ये बटाट्याचे वडे पावाच्या आत ठेऊन बनवले जातात. हिरवी मिरची आणि कोथिंबीर किंवा लसणाची चटणी वडा पावाची चव आणखीनच वाढवते.
 
छोले भटुरे
छोले भटुरे हा भारतातील सर्वात प्रसिद्ध पदार्थांपैकी एक आहे. पूर्वी पंजाबच्या काही भागांमध्ये स्ट्रीट फूड म्हणून छोले भटुरे प्रचलित होते पण आता उत्तर भारतातील इतर भागांतून ही डिश खूप पसंत केली जात आहे. या डिशमध्ये चणे विविध प्रकारचे मसाले घालून तयार केले जातात आणि या मैद्यापासून बनवलेल्या भटुरेबरोबर खाल्ले जातात. छोले भटुरे हा पंजाबी लोकांचा आवडता पदार्थ आहे आणि तो सहसा स्ट्रीट फूड म्हणून जास्त खाल्ले जाते.
 
मक्का रोटी- सरसो साग
मक्के की रोटी - सरसो का साग हे पंजाबचे प्रसिद्ध पदार्थ असले तरी भारतातील प्रमुख पदार्थांच्या यादीत त्याचे नाव देखील समाविष्ट आहे. भारतभर आवडला जाणारा हा पदार्थ आहे. या डिशमध्ये सरसो साग ताज्या मोहरीच्या पानांपासून बनवले जाते आणि मक्याच्या पीठाने रोटी तयार केली जाते. याशिवाय ही डिश आणखी रुचकर बनवण्यासाठी मक्क्याच्या पोळीवर लोणी घालून खाल्ले जाते.
 
लिट्टी चोखा
लिट्टी चोखा हे भारतातील सर्वात प्रसिद्ध फूड आहे जे प्रामुख्याने भारताच्या बिहार राज्यात प्रसिद्ध आहे. तसे, ही डिश तुम्हाला भारतातील कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये मिळेल. लिट्टी चोखा हा असा स्वादिष्ट पदार्थ आहे जो तुम्ही दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण आणि कोणत्याही खास प्रसंगी खाऊ शकता. हे प्रसिद्ध भारतीय खाद्यपदार्थ आटा, सत्तू आणि वांग्याच्या भरतासोबत खाल्ले जाते.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

शालेय बस झाडाला धडकल्याने अमरावतीतील २५ मुले थोडक्यात बचावली

एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतली

LIVE: महिलेला सरकारी नोकरीचे आमिष दाखवून ५ लाख १७ हजार रुपये गंडवले

फिलीपिन्स बोट अपघातात जळालेल्या प्रवासी बोटीतून आणखी मृतदेह बाहेर काढले, मृतांचा आकडा ७६ वर

सरकारी नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली एका व्यक्तीची ५.१७ लाख रुपयांची फसवणूक

पुढील लेख
Show comments