suvichar

चीनची भारताला धमकी

Updated: शुक्रवार, 19 जून 2020 (10:56 IST)
 
सोमवारी रात्री, गलवान खोर्यात झालेल्या हिंसाचारामुळे भारत आणि चीनमध्ये तणाव वाढला आहे. त्यानंतर दोन्ही देशांनी सैन्याची जमवाजमव सुरू केली आहे. तर, दुसरीकडे चीन सरकारचे वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्समधून भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू असून अप्रत्यक्षपणे धमकीही दिली जात आहे. ग्लोबल टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, भारताशी संघर्ष करण्यास चीन पुर्णपणे सज्ज असल्याचे विश्लेषकांनी म्हटले आहे. भारताने आपल्या सैन्याला आवर घालावा. अन्यथा कोरोनाच्या संकटात मोठी किंमत मोजावी लागणार असल्याचे चिनी विश्लेषकांनी म्हटले आहे.
 
“शांघाई अकादमी ऑफ सोशल सायन्स“चे के हू झियोंग यांनी सांगितले की, भारताचे चीन, पाकिस्तान आणि नेपाळसोबत वाद सुरू आहे. पाकिस्तान हा चीनचा विश्वासू सहकारी आहे. तर , नेपाळचे आणि चीनचे जवळचे संबंध आहेत. दोन्ही देश चीनच्या बेल्ट ऍण्ड रोड प्रकल्पातील सहकारी आहेत. आणखी तणाव वाढल्यास भारताला तीन आघाडय़ांवर लढावे लागणार असल्याचा इशारा झियांग यांनी दिला. भारताने आपल्या अमेरिका समर्थक लॉबीला आवर घातला पाहिजे. अन्यथा त्याचे वाईट परिणाम होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी चीनच्या लष्कराने तिबेटमध्ये युद्ध सराव सुरु केला असल्याचे “ग्लोबल टाइम्स“ने म्हटले आहे.
 
दरम्यान, गलवान खोर्यातील हिंसक झटापटीनंतर भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी बुधवारी फोनवर चर्चा केली. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांनी गलवान खोर्यातील वाद संवादातून सोडवण्याची मागणी केली. शक्य तेवढय़ा लवकर ही परिस्थिती निवळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली आहे. तर दुसरीकडे चीन परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय सैन्यालाच जबाबदार धरत प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. एस जयशंकर यांनीही कणखर शब्दात भारताची बाजू मांडली.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

मी हक्कांविषयी बोलण्यासाठी गेलो होतो; पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर शरद पवारांनी दिल्ली दौऱ्याचे कारण स्पष्ट केले

सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे मुंबईत पूरस्थिती; ४८ तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी

एसी, रेफ्रिजरेटर, की सीलिंग फॅन; वर्षभरात कोणते घरगुती उपकरण सर्वाधिक वीज वापरते?

तुम्ही घरबसल्या रहिवासी प्रमाणपत्र कसे मिळवू शकता? येथे जाणून घ्या....

LIVE: पश्चिम रेल्वेकडून मोठी कारवाई: चर्चगेट-विरार रेल्वेमार्गालगतची बेकायदेशीर अतिक्रमणे हटवण्याची मोहीम

पुढील लेख
Show comments