suvichar

पाकमध्ये हिंदू विवाह कायद्याला मंजुरी

Updated: रविवार, 19 फेब्रुवारी 2017 (21:38 IST)
 
'हिंदू विवाह विधेयक-२0१७'हे हिंदूंच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे विधेयक शुक्रवारी सिनेटने पारित केले. हे विधेयक म्हणजे हिंदू समुदायाचा पहिला विस्तृत 'पर्सनल लॉ' आहे. नॅशनल असेम्ब्लीने गत १५ सप्टेंबर २0१५ पूर्वीच हे विधेयक पारित केले आहे. त्यामुळे राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीची औपचारिकता आटोपल्यानंतर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होईल. हा कायदा विवाहाची नोंदणी, घटस्फोट व पुनर्विवाहाशी संबंधित असल्यामुळे हिंदूंचा या विधेयकाला मोठा पाठिंबा आहे. यात विवाहासाठी मुला-मुलीचे किमान वय १८ वर्षे असे निश्‍चित करण्यात आले आहे. या विधेयकाच्या माध्यमातून हिंदू महिलांना आपल्या विवाहाचे दस्तावेजी पुरावेही मिळणार आहेत.
 
हिंदूंचा हा पहिला वैयक्तिक कायदा सिंध वगळता पंजाबसह बलुचिस्तान व खैबर पख्तुंख्वा या तिन्ही प्रांतांत लागू होणार आहे. सिंधमध्ये यापूर्वीच असा एक कायदा तयार करण्यात आला आहे. कायदामंत्री जाहिद हमीद यांनी 'हिंदू विवाह विधेयक-२0१७' हे विधेयक सादर केले. त्यानंतर ते बहुमताने पारित करण्यात आले. 'सिनेट फंक्शनल कमिटी ऑन ह्युमन राइट्स'ने गत २ जानेवारी रोजी मोठय़ा बहुमताने या विधेयकाला मंजुरी दिली होती. दुसरीकडे 'आम्ही पाकिस्तानी हिंदूंसाठी एकही वैयक्तिक कायदा करू शकलो नाही. हे केवळ इस्लामचे सिद्धांतच नव्हे, तर मानवाधिकारांचेही उल्लंघन आहे,' असे मत या विधेयकाला मंजुरी देताना समितीच्या अध्यक्षा तथा मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंटच्या सिनेटर नसरीन जलील यांनी व्यक्त केले. दरम्यान, सत्ताधारी पीएमएल-एनचे हिंदू खासदार रमेशकुमार वंकवानी यांनी या कायद्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी प्रवाशांना दिलासा, मध्य रेल्वे मिरज-दादर एकमार्गी विशेष ट्रेन चालवणार

LIVE: आषाढी एकादशीच्या दिवशी मध्य रेल्वे मिरज-दादर एकमार्गी विशेष ट्रेन चालवणार

आता तुम्ही मोबाईल नेटवर्कप्रमाणे तुमची वीज कंपनी निवडू शकता; सरकारने एक नवीन योजना तयार केली

भारतातील रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची घोषणा, डब्यांमधील सुरक्षा व्यवस्थाही कडक केली जाणार

नीट पेपरफुटी वादाच्या पार्श्वभूमीवर, शिक्षण मंत्रालयाने एनटीएच्या ४७ अधिकाऱ्यांवर कारवाई केली

पुढील लेख
Show comments