Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नेदरलॅन्ड हा भारताचा स्वाभाविक भागीदार

Updated: बुधवार, 28 जून 2017 (11:25 IST)
नेदरलॅन्डचे पंतप्रधान मार्क रुट यांच्याबरोबर झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर दोन्ही देशांमध्ये सामाजिक सुरक्षा, जल सहकार्य आणि सांस्कृतिक सहकार्याविषयीच्या तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. “मिसाईल टेक्‍नोलॉजी कंट्रोल रेजिम’मधील सदस्यत्वासाठी भारताला पाठिंबा दिल्याबद्दल रुट यांना धन्यवाद दिले. नेदरलॅन्डच्या सहकार्याशिवाय “एमटीसीआर’मधील भारताचा सहभाग शक्‍यच नव्हता, असे मोदी यांनी म्हटले आहे. भारताला “एमटीसीआर’मध्ये गेल्या वर्षी पूर्ण सदस्यत्व मिळाले. यामुळे भारताला उच्च तंत्रज्ञानाचे क्षेपणास्त्र तंत्रज्ञान खरेदी करणे शक्‍य होणार आहे. तसेच रशियाबरोबरच्या संयुक्‍त उपक्रमामध्येही सहभागी होता येणार आहे.
 
भारत आणि नेदरलॅन्डदरम्यानचे संबंध शतकापासूनचे आहेत आणि दोन्ही देशांकडून हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्न केले जातील. नेदरलॅन्ड हा भारतासाठी जगभरातील 5 व्या क्रमांकाचा गुंतवणूक भागीदार देश आहे. भारतामध्ये नेदरलॅन्डने गेल्या तीन वर्षात तिसऱ्या क्रमांकाची थेट विदेशी गुंतवणूक केल्याचेही मोदींनी सांगितले.
तीन देशांच्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यामध्ये मोदी नेदरलॅन्डच्या भेटीवर आहेत. आपल्या एकदिवसाच्या भेटीदरम्यान मोदी डच राजे विलेम अलेक्‍झांडर यांच्याशीही चर्चा करतील आणि महाराणी मॅक्‍झिमा यांचीही भेट घेणार आहे. महत्वाच्या डच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशीही ते भेट घेणार आहेत.
 
भारतासाठी युरोपाचा ‘एन्ट्री पॉईंट’
संयुक्‍त पत्रकार परिषदेमध्ये नेदरलॅन्डचे पंतप्रधान रुट यांनी भारताचे वर्णन भावी जागतिक महासत्ता असे केले. आर्थिक आणि राजकीय दृष्टीकोनातूनही भारतात होणाऱ्या विकासाचे त्यांनी स्वागत केले. नवीकरणी उर्जा क्षेत्रामध्ये आणि वातावरण बदलासंबंधीच्या पॅरिस कराराबाबत भारताच्या बांधिलकीबाबत रुट यांनी कौतुक केले. भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थसत्ता आहे आणि भारतीय बाजारपेठांमध्ये मोठी संधी आहे. भारतासाठी देण्यायोग्य अनेक गोष्टी नेदरलॅन्डकडे आहेत, असे रुट म्हणाले. “स्वच्छ भारत’ आणि “मेक इन इंडिया’सारख्या स्थायी पुढाकारांबाबतही रुट यांनी मोदी यांचे कौतुक केले आहे. नेदरलॅन्ड हा आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारताचा महत्वाचा भागीदार आहे. युरोप हा भारतासाठी व्यापारी भागीदार आहे. भारतातून युरोपात होणारी 20 टक्के निर्यात नेदरलॅन्डच्या माध्यमातून होते. त्यामुळे भारतासाठी नेदरलॅन्ड हा युरोपाचा “एन्ट्री पॉईंट’ आहे, असेही रुट यांनी सांगितले.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्रात जंतर मंतरपेक्षाही मोठे आंदोलन होणार! काँग्रेसच्या खासदाराचा दावा

सर्वोच्च न्यायालयाने 'आर्ट ऑफ लिव्हिंग'ला यमुना नदीच्या पूरक्षेत्राचे पर्यावरणीय नुकसान केल्याच्या सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्त केले

भंगार उतरवताना वाहनाच्या डिझेल टाकीचा स्फोट होऊन दोन मुलांसह चार जणांचा मृत्यू

महिलांची ओळख केवळ पत्नी, मुलगी आणि आई एवढीच नाही... तर भारताची सर्वात मोठी ताकद; पुण्यात राहुल गांधी गरजले

गोंदियामध्ये १२६ मलेरियाचे रुग्ण आढळले; देवरीमध्ये एकाचा मृत्यू

पुढील लेख
Show comments