Festival Posters

हार्दिक पटेलला भर सभेत मारले हे आहे खरे कारण

शनिवार, 20 एप्रिल 2019 (07:13 IST)
गुजरात येथे भर प्रचार  सभेत काँग्रेस नेता हार्दिक पटेलच्या कानशिलात लगावली घटना घडली आहे. या सर्व प्रकारामुळे  सभेत चांगलाच गोंधळ उडाला होता. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात हार्दिकला कानशिलात लगावण्यामागचे नेमके कारण काय ? चर्चेला ऊत आला होता. मात्र त्या मारणाऱ्या अज्ञात व्यक्तीने उलट सुलट सुरू असलेल्या चर्चेला पुर्णविराम देत कानशिलात लगावण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे. 
 
कानाखाली मारणाऱ्या या  व्यक्तीचे नाव तरूण गज्जर असे असून,  गज्जर याने एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना प्रतिक्रिया दिली की, जेव्हा पाटीदार समाजाचे आंदोलन गुजरात येथे  सुरू होते. त्यावेळी माझी पत्नी गर्भवती होती. तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असतांना, पाटीदार समाजाच्या सुरू असणाऱ्या आंदोलनामुळे मला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. त्याचवेळी मी हार्दिकला मारण्याचा निर्णय घेतला होता. मला त्याला कोणत्याही परिस्थितीत धडा शिकवायचा होता. म्हणून भर सभेत त्याच्या कानशिलात लगावली. गज्जर पुढे म्हणाला की, जेव्हा अहमदाबाद येथे मेळावा सुरू होता त्यावेळी मी माझ्या मुलासाठी औषधे घेण्यास बाहेर गेलो,  त्यावेळी सुरक्षा म्हणून सर्व दुकाने बंद ठेवली होती. मात्र हे सर्व बंद असण्या मागे हार्दिकचा हात होता. तो पाहिजे तेव्हा गुजरात बंद करण्याचे आदेश देत असतो. तो गुजरातचा हिटलर आहे. स्वतःला काय समजतो? असा संतप्त सवालदेखील गज्जर यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. त्यामुळे हार्दीकला का मारले आता समोर आले आहे. 

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

World Environment Day 2026 Wishes in Marathi जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा

LIVE: उद्धव ठाकरे यांनी बंडखोर उमेदवार बाळ माने यांना पक्षातून काढून टाकले

भारताचे व्यापाराचे दरवाजे जगासाठी खुले आहे, मंत्री पीयूष गोयल म्हणाले- भारत जागतिक व्यावसायिक भागीदारीसाठी पूर्णपणे तयार आहे

श्रीलंकेतील वृद्धाश्रमात भीषण आग; ११ वृद्ध व्यक्तींचा मृत्यू तर ७ जण गंभीर जखमी

कोकण विधान परिषद निवडणुकीत गोंधळ उडाला; उद्धव ठाकरे यांनी बाळा माने यांना पक्षातून काढले?

पुढील लेख
Show comments