Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

केंद्राचा हमीभाव वाढ निर्णय म्हणजे शेतकऱ्यांना नवीन गाजर दाखवण्याचा प्रकार; चुनावी जुमला – धनंजय मुंडे

Updated: गुरूवार, 5 जुलै 2018 (14:45 IST)
 
केंद्राने आज शेतकऱ्यांना हमीभाव देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जोरदार आक्षेप घेत सरकारने चार वर्षापूर्वी जे अच्छे दिनाचे स्वप्न दाखवले तेच स्वप्न पुन्हा दाखवले असून ते स्वप्न भंग पावेल असे म्हटले आहे.
 
केंद्र सरकारने सत्तेत येण्याआधी शेतकऱ्यांना दीडपट हमीभाव देण्याचा शब्द दिला होता. चार वर्षे सत्तेत गेल्यावर काही टक्क्याने शेतकरी हमीभाव वाढवला. या निर्णयात कोणतीही मोठी वाढ दिसत नाही. सातत्याने सरकारमार्फत शेतकरी विरोधी धोरण गेली चार वर्षे आणले जात आहे. त्यामुळे आहे ती तो हमीभाव शेतकऱ्यांना मिळत नाही. शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळत नाही. सरकारने हा निर्णय निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घेतला आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार नाही असेही धनंजय मुंडे म्हणाले.
 
हमीभाव आणि बाजारभाव यातील फरकाच्या रक्कमेची तरतूद ठेवली असती तर शेतकऱ्यांना फायदा मिळाला असता, आजचा निर्णय म्हणजे निवडणूक डोळयासमोर ठेवून घेतलेला जुमला आहे अशी टीकाही मुंडे यांनी केली.
 
आजचा निर्णय म्हणजे सरकारच्या पायाखालची वाळू सरकल्याचं दर्शविते. शेतमालाच्या खरेदीसाठी पर्याप्त अर्थसंकल्पीय तरतूद न करता निव्वळ हमीभावात वाढ करणे निरर्थक आहे. गेल्या तीन वर्षातील महाराष्ट्राचा अनुभव पाहता उत्पादित शेतमालाच्या १५ टक्के सुध्दा शासकीय खरेदी हमीभावाने होत नाही याची त्यांनी अनेक उदाहरणे दिली.
 
कापसाची शासकीय खरेदी तर गेल्या तीन वर्षांत नगण्य असून टक्केवारीत सुध्दा मोजता येत नाही. शासकीय खरेदी अभावी ९० टक्के शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल हा व्यापाऱ्यांना हमीभावापेक्षा दीड ते दोन हजार रूपये कमी दराने डिस्ट्रेस सेल म्हणून विकावा लागतो. सन २०१३-१४ च्या तुलनेत गेल्या तीन वर्षात शेतमालाची निर्यात सुमारे ६५ ते ६७ हजार कोटी रूपयांनी कमी झाली असून शेतमालाची आयात प्रतिवर्ष ६४ ते ६५ हजार कोटी रूपयांनी वाढली आहे व त्यामुळे सर्वसाधारपणे देशात शेतमालाचे अतिरिक्त साठे निर्माण होऊन बाजारभाव पडले आहेत असे ते म्हणाले.
 
शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेला केंद्र शासनाचे शेतकरी विरोधी आयात-निर्यात धोरण व कृषिमाल पणन धोरण कारणीभूत आहे. त्याला हमीभावाच्या मलमपट्टीने काहीही फरक पडणार नाही असेही ते म्हणाले.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

LIVE: एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या जलद धाडींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा मिळाला

मुंबई : तुकाराम मुंडे यांची कठोर कारवाई, ६ आस्थापनांचे परवाने रद्द

रात्रीचा प्रवास अधिक सुलभ होणार, ५० नवीन वंदे भारत स्लीपर गाड्या सुरू होणार

नितीन गडकरी म्हणतात मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग खड्डेमुक्त, पुण्यात ६०,००० कोटी रुपयांचा प्रकल्प प्रस्तावित

महाराष्ट्रातील १.२५ लाख ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मराठी शिकली, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण

पुढील लेख
Show comments