Marathi Biodata Maker

कॅशलेस व्यवहार करा, जिंका रोख पारितोषिके

शुक्रवार, 16 डिसेंबर 2016 (13:33 IST)
केंद्र सरकारकडून ईकॉमर्स च्या मदतीने कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी  नव्या योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. डिसेबर २५ पासून म्हणजेच नाताळच्या शुभमुहूर्तावर सुरवात होऊन १४ एप्रिल पर्यंत लागू असेल. यामध्ये ग्राहकांना एक कोटी पर्यंत जिंकण्याची संधी आहे.
 
यासंदर्भात निती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी ट्विटरवर घोषित केले. त्याचप्रमाणे या योजनेसाठी ३४० कोटी रुपयांची भरघोस तरतूद करण्यात आली आहे. या योजनेतील १५ हजारे ग्राहकांना दररोज प्रत्येकी एक हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. हि योजना मुख्यत्वे जे ग्राहक कॅशलेस म्हणजेच ऑनलाइन पेमेंट करतील त्यांच्यासाठीच आहे. योजनेच्या शेवटच्या तारखेला म्हणजेच १४ एप्रिल रोजी एक कोटी रुपयांचे अंतिम पारितोषिक जाहीर करण्यात येईल. द्वितीय क्रमांकाला ५० लाख, तर तृतीय विजेत्याला २५ लाख रुपये मिळतील.व्यापारी वर्गासाठी डिजीटल धन व्यापारी योजनेअंतर्गत भाग्यविजेत्या व्यापाऱ्यांना आठवड्याला ५० हजार रुपयांपर्यंत बक्षीस जिंकण्याची संधी आहे. इतर ग्राहकांना देखील दर आठवड्याला सात हजार बक्षीसं जाहीर केली जातील.

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

शेतकरी कर्जमाफीच्या अटींविरोधात रोहित पवार यांचे उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरू, प्रकृती खालावली

छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणे महागात पडले, पोलिसांनी अटक केली

चंद्रपूरमधील दादा ग्रीन ई-मोबिलिटीचे ईव्ही बस चालक पगारवाढीच्या मागणीसाठी संपावर गेले

संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींना 'अघोरी' म्हटले, भाजप संतापली

केईएम रुग्णालयाने सेजल पवार यांना १५ दिवसांच्या रजेवर पाठवले

पुढील लेख
Show comments