Dharma Sangrah

टाटा समूहाचे अध्यक्ष मिस्त्री यांना हटवले

मुंबई- टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून सोमवारी सायरस मिस्त्री यांना हटविण्यात आले. रतन टाटा यांची तात्पुरते अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 2012 मध्ये सायरस मिस्त्री यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती.
 
चार महिन्यात टाटा समूहाचा नवा अध्यक्ष निवडण्यात येणार आहे. त्यासाठी एका समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती नव्या अध्यक्षाचा शोध घेणार आहे. रतन टाटा 28 डिसेंबर 2012 रोजी टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून निवृत्त झाले होते. त्यांच्या जागी संचालक मंडळाने सायरस मिस्त्री यांची नियुक्ती केली होती. 2006 पासून सायरस मिस्त्री टाटा सन्सचे संचालक होते. नोव्हेंबर 2012 मध्ये ते या कंपनीचे उपाध्यक्ष झाले होते. काही दिवसांपूर्वीच सायरस मिस्त्री यांनी टाटा समूहातील कर्मचार्‍यांशी वेबसाईटच्या माध्यमातून संवाद साधला होता. समूहाच्या खडतर काळात चपळता आणि धिटाई अंगी बाणवणे आवश्यक असल्याचे आवाहन त्यांनी कर्मचार्‍यांना केले होते.

सर्व पहा

संत श्री निवृत्तीनाथ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

स्त्रियांनी नारळ का फोडू नये? धार्मिक आणि शास्त्रीय कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

Mangal Nakshatra Parivartan 2026 मंगळ मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार; २४ जुलैपासून या राशींचे नशीब उजळणार!

काळाकुट्ट तवा स्वच्छ करण्यासाठी महागड्या क्लीनरची गरज नाही; ह्या टिप्स पुरेशा आहे

WHO चा धोक्याचा इशारा! जगातील ९२% लोकसंख्येला कर्करोगाचा धोका; पुरुष आणि महिलांमधील 'या' कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक

सर्व पहा

LIVE: भंडारा येथे भीषण अपघातात ट्रॅक्टरखाली चिरडून शेतकऱ्याचा मृत्यू

पुण्यात संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांच्या भव्य स्वागतासाठी सहा लाख वारकरी दाखल

नागपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि ब्लॅकमेल केल्या प्रकरणी आरोपीला अटक

महाराष्ट्र विधानसभेत भेसळ करणाऱ्यांना मृत्युदंडाच्या शिक्षेच्या मागणीवर मंत्री नरहरी झिरवाल यांचे स्पष्टीकरण

भंडारा येथे भीषण अपघातात ट्रॅक्टरखाली चिरडून शेतकऱ्याचा मृत्यू

पुढील लेख
Show comments