suvichar

टाटा समूह एअर इंडिया विकत घेणार

Updated: गुरूवार, 22 जून 2017 (10:39 IST)
 
टाटा ग्रुपचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी केंद्र सरकारशी अनौपचारिक चर्चांमध्ये एअर इंडिया कंपनीत ५१ टक्के भागीदारीची इच्छा व्यक्त केली आहे. केंद्र सरकारलाही एअर इंडियाच्या वास्तवाची जाणीव असून टाटा समुहाने दिलेल्या प्रस्तावावर सरकारही अनुकूल असल्याचे वृत्तात म्हटले आहे. 
 
गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी एअर इंडिया कंपनीच्या खासगीकरणाला पाठिंबा दिला होता. एअर इंडियाच्या खासगीकरणासाठी सर्व पर्यायांचा विचार करत आहोत, असेही जेटली यांनी त्यावेळी सांगितले होते. एअर इंडियावर सध्या ५२ हजार कोटींचे कर्ज आहे. तसेच एअर इंडियाचा कारभार चालवण्यासाठी केंद्र सरकारने ३० हजार कोटींचे मदतीचं पॅकेज जाहीर केले आहे. यापैकी २४ हजार कोटी रुपये सरकारने एअर इंडियाला आतापर्यंत दिले आहेत. 
 
टाटा समूहाचे तत्कालीन प्रमुख जेआरडी यांनी १९३२ मध्ये टाटा एअर लाइन्स सुरू केली होती. स्वातंत्र्यानंतर १९४८ मध्ये टाटा समूह आणि केंद्र सरकारच्या संयुक्त विद्यमाने परदेशातही सेवा देण्याची तयारी टाटा समूहाने दर्शवली. पाच वर्षांनी या एअरलाईन्सची मालकी सरकारकडे गेली.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

मुख्यमंत्री फडणवीस यांनीच त्यांच्या दिल्ली दौऱ्याबद्दलच्या अटकळांवर मौन सोडले, महाराष्ट्रातच राहणार असल्याचे स्पष्ट केले

उद्धव यांना आनंद साजरा करण्याची संधी मिळाली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे यांच्या अभिनंदन मोर्चावर टीका केली

एफडीएने महाराष्ट्रात १५ हून अधिक सौंदर्यप्रसाधनांवर कारवाई करत त्यांच्या विक्रीवर बंदी घातली

बीएमसीचा मोठा निर्णय, प्रलंबित जन्म दाखल्याच्या अर्जांवर त्वरित कार्यवाही केली जाईल

LIVE: महाराष्ट्र एफडीएने १५ हून अधिक सौंदर्य प्रसाधनांच्या विक्रीवर बंदी घातली

पुढील लेख
Show comments