suvichar

1 जूनपासून होणार हे तीन मोठे बदल, या गोष्टी महागणार

Updated: रविवार, 28 मे 2023 (16:53 IST)
 
मे महिना नुकताच संपत आला आहे. जून महिन्याच्या 1 तारखे पासून काही बदल होणार आहे. ज्याचा आपल्या बजेटवर थेट परिणाम होणार आहे. हे बदल कोणते आहे जाणून घेऊया. 
 
1 एलपीजी सिलेंडरची किंमत- 
एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती वाढू किंवा कमी होऊ शकतात. सरकारी तेल, पेट्रोलियम आणि गॅस कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला किमतीत बदल करतात. या किमती वाढू किंवा कमी होऊ शकतात. सरकारी गॅस कंपन्यांकडून एप्रिल आणि मे महिन्यात 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने कपात करण्यात आली. मात्र 14 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडर मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आता 1 जून रोजी सिलिंडरच्या दरात काय बदल होतात हे पाहावे लागणार. 
 
 2 इलेक्ट्रिक टू व्हीलरच्या किमतीत बदल- 
जून महिन्यात इलेक्ट्रिक टू व्हीलरच्या किमतीत मोठा बदल होऊ शकतो. सध्या इलेक्ट्रिक टू व्हीलर वर सरकार कडून दिले जाणारे अनुदान कमी करण्यात आले आहे. या पूर्वी हे अनुदान 15 हजार रुपये प्रति किलोवॅट तास होती. ती कमी करून 10 हजार रुपये  करण्यात आली आहे. त्यामुळे जून महिन्यात इलेक्ट्रिक दुचाकी घेणे महागात पडू शकते.
 
3 सीएनजी -पीएनजीच्या किमतीत बदल -
गॅस सिलिंडर प्रमाणे सीएनजी -पीएनजीच्या किमती बदलतात एप्रिल महिन्यात दिल्ली आणि मुंबईत सीएनजी आणि पीएनजीच्या किमती कमी करण्यात आल्या आहे. मे महिन्यात कोणताही बदल झालेला नाही. अशा परिस्थितीत जून महिन्यात सीएनजी -पीएनजीच्या किमतीत मोठा बदल होऊ शकतो की नाही हे पाहावे लागणार. 
 
Edited by - Priya Dixit 
 
 

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी प्रवाशांना दिलासा, मध्य रेल्वे मिरज-दादर एकमार्गी विशेष ट्रेन चालवणार

LIVE: आषाढी एकादशीच्या दिवशी मध्य रेल्वे मिरज-दादर एकमार्गी विशेष ट्रेन चालवणार

आता तुम्ही मोबाईल नेटवर्कप्रमाणे तुमची वीज कंपनी निवडू शकता; सरकारने एक नवीन योजना तयार केली

भारतातील रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची घोषणा, डब्यांमधील सुरक्षा व्यवस्थाही कडक केली जाणार

नीट पेपरफुटी वादाच्या पार्श्वभूमीवर, शिक्षण मंत्रालयाने एनटीएच्या ४७ अधिकाऱ्यांवर कारवाई केली

पुढील लेख
Show comments