Festival Posters

‘अग्निपंख’ सिनेमाचा टीजर

‘अग्निपंख’या सिनेमाचा टीजर पोस्टर नुकताच फेसबुकवर प्रदर्शित झाला. हॉलीवूडपट वाटावा असा हा पोस्टर मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. फायर ब्रिगेडवर आधारीत बीग बजेट सिनेमावर काम सुरू असल्याची चर्चा गेल्या वर्षभरापासून होती. आता हा पोस्टर पाहून या सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. ‘विटीदांडू’ या यशस्वी चित्रपटानंतर दिग्दर्शक गणेश कदम यांचा ‘अग्निपंख’हा ड्रीमप्रोजेक्ट आहे.
 
महाकाय अग्नितांडव असो...भूकंप असो वा महाप्रलय, मनुष्यजीवासह प्राणी-पक्ष्यांचेही जीव वाचविण्याचे कार्य अग्निशमन दल प्रतिकुल परीस्थितीत करत असते. उन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता अग्निशामक जवानांची अग्नि आणि जीवसुरक्षेप्रती असलेली निष्ठा वेळोवेळी अधोरेखित झाली आहे. अशा कर्तव्यनिष्ठ अगिनिशमन दलाचा संघर्ष एका जबरदस्त थरारक आणि रोमांचकारी घटनेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
 
“अग्निशमन दलावरचा हा पहिला भारतीय ॲक्शनपट आहे. भारतातील सर्वोत्कृष्ट सिनेतंत्रज्ञांचा सहभाग हि या चित्रपटाची जमेची बाजू आहे. त्यामुळे ‘अग्निपंख’ मराठी प्रेक्षकांसाठी व्हीज्युअल ट्रीट असणार आहे.” असा विश्वास दिग्दर्शक गणेश कदम यांनी व्यक्त केला.
 
“अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि ग्राफिक्स मुळे चित्रपटाचं बजेट मोठं असलं तरी कसलीही कसर बाकी न ठेवता दृश्यानुभव उच्च प्रतीचा राखण्याचा आमचा प्रयत्न आहे. अग्निशमन दलाच्या सर्वात कठीण, श्वास रोखून ठेवणाऱ्या मोहिमेचा थरार प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.” असे मत निर्माते रुतुजा बजाज आणि अनिल गायकवाड यांनी व्यक्त केले.
 
या चित्रपटातील कलाकार कोण?  या प्रश्नाचे उत्तर अजुनही गुलदस्त्यात आहे. ‘अग्निपंख’ची कथा गणेश कदम यांची असून पटकथा सचिन दरेकर यांनी लिहिली आहे. ‘रीतू फिल्म कट’ निर्मित ‘अग्निपंख’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

सर्व पहा

धर्मेंद्र यांच्या बायोपिकमध्ये मुख्य अभिनेता कोण साकारणार?बॉबी देओलने हे उत्तर दिले

खिशाला कात्री न लावता सरकारी बजेट पॅकेजेसमध्ये फॅमिलीसोबत सुरक्षितपणे फिरून या

चित्रपट महामंडळाला स्थिर आणि कृतिशील कार्यकारिणी देण्याची समर्थ पॅनलची ग्वाही

रणवीर सिंगने एफडब्ल्यूआयसीई (FWICE) बंदीविरोधात न्यायालयात धाव घेतली, कायदेशीर नोटीस पाठवली

'दुसरा राम कोणालाही बघायचा नाही', रामायणममधील रणबीर कपूरच्या कास्टिंगच्या वादावर अरुण गोविल यांचे मोठे विधान

सर्व पहा

भारतातील या सुंदर थंड हवेच्या ठिकाणी परदेशी नागरिकांना प्रवेश नाही

पेड्डी'मधील जान्हवी कपूरच्या भूमिकेमुळे वाद निर्माण, दिग्दर्शकाने माफी मागितली

भयंकर! प्रसिद्ध अभिनेत्याचा खून

तो सीन संपला, पण....अभिनेत्री प्रिया बापटने कठीण काळात सहन कराव्या लागलेल्या अडचणींबद्दल खुलासा केला

CJP आंदोलनाला सेलिब्रिटींचा पाठिंबा! अतुल कुलकर्णींनी मागितली तरुणाईची माफी

पुढील लेख
Show comments