Dharma Sangrah

प्रेमाला जात नसते मांडणारे स्टार प्रवाहचे ‘पुढचे पाऊल’

बुधवार, 21 डिसेंबर 2016 (17:36 IST)
स्टार प्रवाहवरच्या ‘पुढचे पाऊल’ या मालिकेत सध्या सुरु असलेल्या एपिसोडिक कथेने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.अक्कासाहेबांच्या कोल्हापुरात सत्यजित  आणि तेजस्विनीची बहरणारी ही प्रेमकथा वेगळी आहे.
 
कोणी कोणाची जात पाहुन, कोणी कोणाला आवडत नसते, प्रेमात ही अटच नसते. प्रेमाची स्वत:ची एक भाषा आणि प्रेमात स्वत:च एक जगणं असतं.  जात बघून प्रेमात पडता येत नाही. पण अशा प्रेमाचे लग्नात रुपांतर होताना होणारा संघर्ष आज आधुनिकतेच्या जगातही कायम आहे. हा संघर्ष टाळता येऊच शकणार नाही का? हा महत्वाचा प्रश्न खूप संयत आणि वास्तवदर्शी पद्धतीने या मालिकेतून उलगडत आहे.विशेष म्हणजे प्रगत समजल्या जाणाऱ्या ग्रामीण महाराष्ट्रातले हे अस्वस्थ करणारे वास्तव आहे,पण ते मांडताना कुठलाही फिल्मीपणा टाळून ‘पुढचे पाऊल’ या वास्तवावर एक वेगळा दृष्टीकोन मांडते. मालिका विश्वात दीर्घकाळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अक्कासाहेबांचे हे ‘पुढचे पाऊल’ म्हणूनच वेगळे ठरते आहे.
 
संकटातून मार्ग काढणाऱ्या,प्रश्नांची अचूक उकल करणाऱ्या  अक्कासाहेब,सत्यजित  आणि तेजस्विनीच्या प्रेमकहाणीत नेमकी काय भूमिका घेतात याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. अक्कासाहेबांच्या सरदेशमुख कुटुंबासोबत श्रीकांत देसाई,मयूर खांडगे,आरती मोरे,अमित खेडेकर,संदीप जुवाटकर,नीता वझे,फ्रान्सिस ऑगस्टिन या अभिनयसंपन्न कलाकारांच्या सहभागाने हा कथाभाग विशेष रंगतो आहे.

सर्व पहा

कॉकटेल २ चित्रपट समीक्षा: सुंदर वेष्टनात सादर केलेली एक कमकुवत प्रेमकथा

साधेपणाचे एक उदाहरण: सुनील ग्रोव्हर ऋषिकेशमध्ये फूटपाथवर चादर पसरून झोपले

'देऊळ बंद २' या मराठी चित्रपटाचे ४२ लाख रुपयांचे बिल शाहरुख खानने माफ केले; चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला

3 इडियट्स'च्या सिक्वेलबद्दल मोठी बातमी, राजकुमार हिरानी यांनी कथेचे गुपित उघड केले

'वेलकम टू द जंगल'मध्ये नवीन गाणे प्रदर्शित, अमृता फडणवीस यांच्या आवाजाने 'दिवाने हैं' हा सुपरहिट ट्रॅक झाला

सर्व पहा

'द इंडिया स्टोरी'चा टीझर प्रदर्शित, काजल अग्रवाल-श्रेयस तळपदेने कीटकनाशक शेतीचे भीषण सत्य उघड केले

जेव्हा कार्तिक आर्यन एका चुंबनासाठी ३७ रिटेक्स द्यावे लागले

अभिनेत्रीच्या घरी तरुणाचा मृतदेह आढळला

वेलकम टू द जंगल' मधील रोमँटिक गाणे 'ओ मेरे बलम' प्रदर्शित झाले

गोठलेली सरोवरे, निळे महासागर; भारतातील नैसर्गिक ठिकाणे, जेथील दृश्ये रहस्यमय अनुभव देतात!

पुढील लेख
Show comments