Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘आम्ही दोघे राजाराणी’ सहकुटुंब अनुभवावं असं निखळ मनोरंजन

Updated: बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 (16:02 IST)
  
पार्थ आणि मधुरा हे दोन राजा राणी या मालिकेत असून ही दोघेही आपापल्या अतरंगी कुटुंबासोबत राहतात. एकत्र कुटुंबात वाढणाऱ्या या दोघांचे त्यांच्या कुटुंबावर अतोनात प्रेम आहे पण त्यांचे नमुनेदार कुटुंबिय या दोघांच्या प्रेमकहाणीत जबरदस्त तडका देणार आहेत. दोघांच्या राजाराणीच्या संसारात त्यांची कुटुंब काय करामती करतायत हे अतिशय मनोरंजक आणि तितक्याच खुमासदारपणे मांडण्यात आलं आहे. या दोघांची हटके भेट,त्या भेटीचे मैत्रीत आणि त्यानंतर प्रेमात कसे रुपांतर होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. प्रेमाची गुलाबी छटा असलेली ही रोमँटिक  कॉमेडी मालिका संपूर्ण कुटुंबासह पहावी अशी आहे. 
संगीता राकेश सारंग यांच्या 'कॅम्सक्लब'ने या मालिकेची निर्मिती केली आहे. विजय पटवर्धन, समीर चौघुले आणि अभिजित पेंढारकर मालिकेचं लेखन करत असून, संचित वर्तक दिग्दर्शन करत आहेत. मंदार कुलकर्णी, दीप्ती लेले या देखण्या गोंडस जोडी सोबत मिलिंद फाटक, विनय येडेकर, मैथिली वारंग, सुलेखा तळवलकर,शीतल शुक्ल आदी विनोदी अभिनायात मुरब्बी  कलाकार यातील भूमिका साकारत आहेत. विनय येडेकर 'विकता का उत्तर' हा हटके गेम शो, 'गोठ',‘ग....सहाजणी’ आणि 'नकुशी... तरीही हवीहवीशी' या तीन मालिकांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे 'आता थांबायचं नाय' म्हणत 'स्टार प्रवाह' उत्तम आशय आणि निखळ मनोरंजनासाठी 'आम्ही दोघं राजा राणी' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे.त्याचे प्रेक्षक नक्कीच स्वागत करतील असा स्टार प्रवाह वाहिनीला विश्वास आहे.

सर्व पहा

कबीर खानच्या चित्रपटाच्या सेटवर कार्तिक आर्यन जखमी, गुडघ्याच्या शस्त्रक्रिया होणार

कार्तिक आर्यनने स्वतःची निर्मिती संस्था, डोपामाइन स्टुडिओ सुरू केली

विमल वेलचीच्या जाहिरातीवरून मुकेश खन्ना संतापले, शाहरुख आणि अजय देवगण यांना माफी मागण्यास सांगितले

राजपाल यादवने ₹१,२०० कोटी किमतीचा करार केला; अभिनेता १२ चित्रपटांमध्ये काम करणार

अभिनेता रणवीर सिंग ने 'प्रलय'च्या चित्रीकरणाला सुरुवात केली

सर्व पहा

गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा मुलगा यशवर्धनसोबत फॅमिली कोर्टात गेली; जाणून घ्या कारण

Bhimashankar Jyotirlinga भगवान शिवाच्या घामातून उगम पावलेल्या भीमा नदी तीरावर स्थापित जागृत भीमाशंकर ज्योतिर्लिंग

कबीर खानच्या चित्रपटाच्या सेटवर कार्तिक आर्यन जखमी, गुडघ्याच्या शस्त्रक्रिया होणार

कार्तिक आर्यनने स्वतःची निर्मिती संस्था, डोपामाइन स्टुडिओ सुरू केली

विमल वेलचीच्या जाहिरातीवरून मुकेश खन्ना संतापले, शाहरुख आणि अजय देवगण यांना माफी मागण्यास सांगितले

पुढील लेख
Show comments