Marathi Biodata Maker

काश्मीरमधून पलायनाची वेदनादायक कहाणी, काश्मिरी पंडितांच्या तोंडी KashmirFIles

Updated: मंगळवार, 15 मार्च 2022 (18:09 IST)
 
आम्ही सगळ्यांकडे जाऊन आमची कैफियत मांडली, पण ऐकलं कुणी, पहिल्यांदाच आमची यादी केली जात आहे, पहिल्यांदाच आमच्या अस्मितेचं संकट दूर करण्यासाठी उपाय शोधले जात आहेत....KashmirFIles मध्ये जे दर्शवण्यात आले आहे, जे बघून सर्व घाबरत आहेत, ओरडतं आहे.... पण आम्ही ते सर्व बघितलं आणि भोगलं आहे. सर्वोच्च न्यायालयानेही आमची याचिका फेटाळून लावली.. आम्ही काय करायचे? आपण सांगा....?
 
माझ्या आईने आपल्या शेवटच्या काळात मला म्हटलं होतं की माझा देहावर कश्मीरमध्ये संस्कार करा, मी विचारले आपण असे का म्हणतं आहात तर त्यांनी म्हटले की तेथील आग आज विझली आहे.. कल्पना करा की हे ऐकून मुलाला कसे वाटले असेल? माझी तिथे दोन घरं आहेत, आता तिथे कोण राहतं ते मला माहीत नाही? माझ्याकडे किमान 100 एकर जमीन होती ज्यावर फळांच्या बागा होत्या....माझी बायको तिथून फक्त एक जोड कपडे घालून आली होती, तेही वलून होते, कानपूरच्या उन्हात आमच्याकडे ते बदलायलाही पैसे नव्हते. 7-8 महिने कपडे बदलले नाहीत. 48 डिग्री तापमानात त्या कपड्यांतून तिच्या अंगातून रक्त वाहू लागले. आमच्याकडे कोणी पाहिले, आमचे कोणी ऐकले? आज विवेक अग्निहोत्रीने किमान चित्रपटाच्या माध्यमातून देशातील लोकांपर्यंत पोहोचण्याचे धाडस केले आहे.
 
हे सरकार पहिल्यांदाच आमची ओळख पुनर्संचयित करण्यासाठी आणि सत्य प्रस्थापित करण्यासाठी काम करत आहे. KashmirFIles बनवून विवेक रंजन अग्निहोत्री यांनी इतिहास रचला आहे. आज आपण स्वतःलाच विसरत चाललो आहोत, शिवरात्री कशी साजरी करायचो हे माझ्या मुलाला माहीत नाही, शैव्य शास्त्र काय आहे, त्याला माहीत नाही...
 
त्यावेळी एकच आवाज, सर्व काश्मिरी पंडितांनी येथून पळून जावे आणि आपल्या बायका येथे सोडाव्या, अशी परिस्थिती होती. विचार करा, एखाद्या मारुन त्याच्या चारीबाजूला नाचण्याची प्रवृत्ती याला आपण काय म्हणाल? कोणता धर्म राक्षसी प्रवृत्तीची शिकवण देतो? या चित्रपटातील प्रत्येक नाव बरोबर आहे, प्रत्येक गोष्ट बरोबर आहे. या चित्रपटातील प्रत्येक दृश्य बरोबर आहे, खरी नावे इतक्‍या सत्यासह उघड करण्याचे धाडस दाखविल्याबद्दल मी विवेक अग्निहोत्री यांना विनम्र अभिवादन करतो.
 
दुर्बल मनाच्या लोकांसाठीही हा चित्रपट पहण्यासारखा आहे कारण काश्मीर हे भारताचे स्वर्ग आहे, त्याच स्वर्गात काश्मिरी पंडितांनी ज्या नरकाचा सामना केला आहे... ते पाहण्यासाठी चित्रपट पहा... यात दाखवण्यात आले आहे की जेनोसाइड कोणाला म्हणतात... आपली एक-एक नस्ल नष्ट करण्यात आली... 32 वर्षांपासून एक कश्मीरी पंडित म्हणत आहे की माझं ऐका, मी देखील याच देशाचा भाग आहे, 4000 लोकांचा खून झाला, साडे सात लाख लोक तेथून निघून देशातील इतर भागांमध्ये विखुरले.... एक ना एक दिवस आपण सगळेच संपुष्टात येणार... आपल्या आयुष्यात काय उरणार आहे? कधी ऐकणार आमचं, कसं बाहेर पडणार आमच्या ह्रदयातील ते भयावह दृष्य....
 
नदी मर्ग हे काश्मीरमधील एक ठिकाण आहे जिथे 28 काश्मिरी पंडित राहतात, त्यांना एका रांगेत उभे करुन मारलं जातं आणि जेव्हा एक मूल त्याच्या आईच्या मृत्यूमुळे रडतो तेव्हा दहशतवादी म्हणतो हा आवाज कुठून येत आहे आणि त्यालाही गोळी मारण्यात येते... हा रानटीपणाचा कळस आहे, तिथे विचाराच्या पातळीवरही जाता येत नाही. हा चित्रपट बघा, बघितला नाही तर कसं समजणार, कसं कळणार? झिरो ग्राउंड रिअ‍ॅलिटी म्हणजे काय हे कसे जाणून घ्याल? ते शब्दात कसे मांडता येणार जे या दृश्यांनी विचलन निर्माण केले आहे... जे दाखवले आहे ते फक्त 2 ते 3 टक्के आहे, अनेक पटींनी आपल्या हृदयात कोरलेले आहे.... आपण जे अनुभवले, भोगले त्याच्या जखमा आजही आपल्या हृदयात आहेत आणि राहतील.
About Author
स्मृति आदित्य
Writer.... Read More

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

गुरुपौर्णिमेनिमित्त श्री श्री रविशंकर यांचा संदेश: जीवनात गुरू आवश्यक आहे का?

आसाममध्ये पुराचा हाहाकार: 24 तासांत 21 जणांचा मृत्यू

जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनागमध्ये दहशतवादी हल्ल्यात जवान शहीद

जंतर मंतर येथे आंदोलनानिमित्त दिल्ली मेट्रोने १६ स्थानके बंद केली

LIVE: मुंबई आणि ठाण्यात जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस; ४८ तासांसाठी 'ऑरेंज अलर्ट'

पुढील लेख
Show comments