suvichar

चीज, पनीर खाल्ल्याने घटला कवटीचा आकार

न्यूयॉर्क- मानव जातीने चीज, पनीर व अन्य दुग्धजन्य पदार्थ खाण्यास सुरूवात केली आणि त्यांचा कवटीचा तसेच जबड्याचा आकार छोटा व कमजोर होत गेला, असे संशोधकांनी म्हटले आहे. या खाद्यपदार्थांमुळे आदिम मानवाला खाण्याचा अधिक पौष्टिक आणि सहज उपलब्ध होणारा पर्याय मिळाला त्यामुळे शिकारीवरील त्यांची निर्भरता कमी होऊ लागली.
 
मुलायम पदार्थ खाण्याची सवय लागल्यामुळे जबड्यावरील दबावही कमी झाला. शिकार बंद झाल्याने हात-पायही छोटे होत गेले. कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांनी सुमारे एक हजार मानवी कवटींवर संशोधन केले. या कवटी संपूर्ण जगाच्या विविध भागातून गोळा करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये माणसाने शेतीवाडी करण्यास आणि दुग्धोत्पादनावर अवलंबून राहण्यास सुरूवात केल्यानंतरच्या काळातील माणसाच्या कवीटींचाही समावेश होता. या काळाच्या आधीच्या कवटींच्या तुलनेत नंतरच्या माणसाच्या कवटी तसेच जबड्यात तफावत आढळून आली.
 
मा़णूस फळे, भाज्या, दुग्धपदार्थ आणि धान्यावर अधिक अवलंबून राहू लागल्याने जंगलात शिकार करुन पोट भरण्याची गरज उरली नाही.

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

शेतकरी कर्जमाफीच्या अटींविरोधात रोहित पवार यांचे उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरू, प्रकृती खालावली

छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणे महागात पडले, पोलिसांनी अटक केली

चंद्रपूरमधील दादा ग्रीन ई-मोबिलिटीचे ईव्ही बस चालक पगारवाढीच्या मागणीसाठी संपावर गेले

संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींना 'अघोरी' म्हटले, भाजप संतापली

केईएम रुग्णालयाने सेजल पवार यांना १५ दिवसांच्या रजेवर पाठवले

पुढील लेख
Show comments