Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

World Earth Day 2022: जाणून घ्या 'जागतिक वसुंधरा दिन' का साजरा केला जातो, त्याचा इतिहास काय आहे आणि यंदा थीम काय

Updated: शुक्रवार, 22 एप्रिल 2022 (08:55 IST)
 
झाडे लावणे, रस्त्यालगतचा कचरा उचलणे, लोकांना शाश्वत जीवन जगण्याचे मार्ग स्वीकारण्यास प्रवृत्त करणे अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जागतिक वसुंधरा दिन साजरा केला जातो. याशिवाय शाळा आणि विविध सामाजिक संस्थांकडून या दिवशी मुलांमध्ये जनजागृती करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केले जातात.
 
या दिवसाचे महत्त्व
1970 पासून दरवर्षी 22 एप्रिल रोजी पृथ्वी दिन साजरा केला जातो. जैवविविधतेचे नुकसान, वाढते प्रदूषण यासारख्या पर्यावरणीय समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी अर्थ डे ऑर्गनायझेशन (पूर्वीचे अर्थ डे नेटवर्क) तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यात 193 देशांतील 1 अब्जाहून अधिक लोकांचा समावेश आहे.
 
2022 वर्षाची थीम काय आहे
यंदाच्या जागतिक वसुंधरा दिनाची थीम 'इन्वेस्ट इन आवर अर्थ' अशी आहे. म्हणजे 'आपल्या पृथ्वीवर गुंतवणूक करा'. यातील कळीचा मुद्दा म्हणजे धैर्याने कार्य करणे, व्यापकपणे नाविन्य आणणे आणि समानतेने अंमलबजावणी करणे. याआधी 2021 साली जागतिक वसुंधरा दिनाची थीम होती 'आमची पृथ्वी पुनर्संचयित करा' आणि 2020 ची थीम 'क्लायमेट अॅक्शन' होती.
 
इतिहास
जागतिक वसुंधरा दिवस जागतिक स्तरावर 192 देशांद्वारे साजरा केला जातो. 60-70 च्या दशकात जंगले आणि झाडांची अंदाधुंद कत्तल पाहता, सप्टेंबर 1969 मध्ये सिएटल, वॉशिंग्टन येथे एका परिषदेत, विस्कॉन्सिनचे अमेरिकन सिनेटर गेराल्ड नेल्सन यांनी तो साजरा करण्याची घोषणा केली. या देशव्यापी जनआंदोलनात अमेरिकेतील शाळा आणि महाविद्यालयांनी सक्रिय सहभाग घेतला. आणि या परिषदेत 20 हजारांहून अधिक लोक जमले होते. हा दिवस 1970 पासून सातत्याने साजरा केला जात आहे.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

MPSC पेपरफुटी प्रकरणातील आरोपी 'उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारा'चा विजेता ! ब्रेकअप आणि १२ लाखांच्या सौद्यामागील कहाणी

तुम्हीही सायबर फसवणुकीचे बळी ठरला आहात का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "या नंबरवर तात्काळ फोन करा"

LIVE: १ सप्टेंबरपासून मुंबईत टॅक्सी-ऑटो प्रवास महाग होणार

१ सप्टेंबरपासून मुंबईतील काळ्या-पिवळ्या टॅक्सी आणि ऑटोंच्या दरात वाढ होणार

मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंडे यांना सुट्या तेलावरील बंदी उठवण्याचे आदेश दिले

पुढील लेख
Show comments