थंडीतल्या या फळाबद्दल असा समज आहे की ती शरीरात रोग वाढवतात (खोकला, कफ इत्यादी) पण थंडीत मिळणार्या या फळांत आणि भाज्यात व्हिटॅमिन सी व कॅरोटीन भरपूर प्रमाणात असते व हे घटक शरीराला संक्रमित रोगांपासून वाचवतात. त्यामुळे हे पदार्थ आपल्या शरीराला फायदेशीरच आहेत.
हिरव्या पालेभाज्या :
ND
ND
थंडीत हिरव्या भाज्या मोठ्या प्रमाणात होतात (पालक, मेथी ज्यात 'बी' कॅरोटीन असते) यात तंतूमय पदार्थही (फायबर) मोठ्या प्रमाणात असल्याने अपचन, डायबेटीस, कॅन्सर व हृदयरोगांपासूनही बचाव होण्यास मदत होते. त्याबरोबरच यात कॅलरी कमी असल्याने वजनही वाढत नाही.
फळे :
ND
ND
थंडीतल्या फळात (संत्री, आवळा, पेरू, सीतापळ, बोरं) अँटी ऑक्सीडेंट व व्हिटॅमिन सी असते. ही सत्वे आपले अल्ट्रा व्हायोलेट किरणे व इतर कितीतरी प्रकारच्या आजारांपासून आपले रक्षण करतात. शरीर रोगमुक्त ठेवण्यासाठी ह्या जीवनसत्वांचे अगदी थोडे प्रमाणच आवश्यक असते. पण यांच्या कमतरतेने शरीराच्या अनेक क्रिया थांबतात. जस े 'एमजी'च्या कमतरतेमुळे शरीर ' सीए' शोषून घेऊ शकत नाही ' एनए' व 'के' शरीरात पाण्याचे संतुलन राखतात ' सीयू' मेंदूच्या वाढीसाठी आवश्यक त र 'एमएन', 'झेडएन' शरीराची वाढ व विकासासाठी महत्वाचे. क्रोमियम शरीरात ग्लूकोज पातळी संभाळण्यासाठी गरजेचे. थंडीत मिळणार्या फळात वरील सर्व घटक योग्य प्रमाणात असतात जी शरीराला निरोगी ठेवण्यासाठी गरजेचीच आहेत.
निसर्गानेच खूप विचार करून प्रत्येक ऋतूत वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवले आहेत. म्हणूनच मोसमी फळांचा आहारात समावेश हवाच. जर ती फळे या ऋतूत हानीकारक असती तर या ऋतूत तयारच झाली नसती (निसर्गाने त्यांना या वेळेत बनवलेच नसते).
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
Read More