Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करणे धोकादायक ठरु शकतं.... कारणे जाणून घ्या

Updated: शुक्रवार, 5 नोव्हेंबर 2021 (08:54 IST)
 
1 प्रजनन क्षमतेवर प्रभाव होतो - 
तज्ज्ञाच्या मतानुसार, 30 मिनिटापेक्षा जास्त काळ गरम पाण्याने अंघोळ केल्यानं मानवाच्या प्रजनन क्षमतेवर प्रतिकूल परिणाम होतो. म्हणून ज्या लोकांना आधीच प्रजननाशी निगडित समस्या आहेत, त्यांनी कोमट पाण्याने अंघोळ करावी. अशा लोकांनी बाथटब मध्ये बऱ्याच काळ गरम पाणी घालून झोपणे किंवा अंघोळ करण्याचा सल्ला दिला जात नाही.
 
2 त्वचेचे संसर्ग आणि ऍलर्जीचा धोका होऊ शकतो -
सतत गरम पाण्याने अंघोळ केल्यानं त्वचेचे संसर्ग आणि ऍलर्जी होण्याचा धोका वाढतो. आरोग्य तज्ज्ञ म्हणतात की जेव्हा आपण सतत गरम पाण्याचा वापर अंघोळ करण्यासाठी करता तर या मुळे त्वचेचा नैसर्गिक ओलावा गमावता, ज्यामुळे आपल्याला वारंवार खाज येते. ज्या मुळे आपल्याला त्वचेचे संसर्ग आणि ऍलर्जी होण्याची शक्यता देखील वाढते.
 
3 आळशीपणा वाढतो - 
डॉक्टरांच्या मते, गरमपणी आपल्या शरीरात ऊर्जेची पातळी कमी करतं. वास्तविक जेव्हा आपण सकाळी गरम पाण्याने आंघोळ करता तेव्हा आपण इतका आराम अनुभवता की आपल्याला एक छोटीशी डुलकी घ्यावीशी वाटते. हे आपल्या शरीरास ताजेतवाने करून त्याला ऊर्जा देण्याऐवजी आळशी बनवतं.
 
4 त्वचेची समस्या -
गरम पाण्याने अंघोळ केल्यावर आपल्याला त्वचेचे आणि आरोग्याचे नुकसान होते. जेव्हा आपण सतत गरम पाण्याने आंघोळ करतात या मुळे त्वचा कोरडी पडायला लागते, ज्यामुळे तीव्र खाज येण्याची समस्या उद्भवते. या शिवाय गरम पाणी आपल्या चेहऱ्या आणि त्वचेची चमक कमी करत. जे लोक गरम पाण्याने अंघोळ करतात, त्यांचा त्वचेवर सुरकुत्या लवकर पडतात आणि ते वृद्धत्वाच्या दिशेने वाटचाल करू लागतात. तसेच, गरम पाणी डोक्यावर पडल्याने केसांचे मूळ कमकुवत होतात. ज्यामुळे केस गळती होऊ लागते आणि आपल्याला कोंड्याच्या समस्येला देखील सामोरी जावं लागतं.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

श्रावणात पचनास हलक्या, पौष्टिक आणि झटपट होणाऱ्या ३ खास 'हेल्दी' उपवासाच्या रेसिपी

साखर न वाढता गोड खायचंय? हे 7 हेल्दी पर्याय जरूर जाणून घ्या

कॉलेज संपताच चांगली नोकरी हवी? आजपासून सुरू करा या 5 सवयी

Skin Tone Lightening : या नैसर्गिक उपायांनी सुंदर त्वचा मिळवा, या टिप्स फॉलो करा

पावसाळ्यात होणारा सर्दी-ताप टाळण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेल्या 10 सवयी

पुढील लेख