Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

परमेश्वर सर्व श्रीमंतांना बुध्दीदेवो

Updated: सोमवार, 14 नोव्हेंबर 2016 (12:28 IST)
किती नश्वर आहे सगळंच.
तरीही आपण अडकत राहतो.
सतत प्रत्येक गोष्टीत.
आता नविन नोटा येतिल.
नाही नाही म्हणत लोक त्याही जमवतील.
मग हळु हळु नकळत 
त्या नोटांवर प्रेम करायला लागतील.
मग परत त्या नोटांच्या जीवावर माज करतील.
मग हा प्रसंग विसरुन जातील.
मग पुन्हा एखादे मोदी येतिल 
पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होईल.
पुन्हा करोडो रुपये मातीत जातील.
पण हे विचार येत नाही.
की पैसे मातित घालण्यापेक्षा गरीबाला द्यावेत हजारो माणसांचे प्रश्न पैशावाचुन अडतात त्यांना द्यावे.
पण नाही.
सडले तरी चालतील पण गरीबाला मदत करणार नाहीत.त्याचे आशिर्वाद घेणार नाहीत.तर त्याला लुबाडुन त्याचे शाप घेतील.पण नोटा जमावतील.
कशी वृत्ती झालेय.
सतत जमवायचं पैसा.
जमिन.घरं.फार्म हाऊस.गाड्या.दागीने.
खरच इतकं लागतं का एका माणसाला?
बरं ते सचोटीन जमवलं तर काही हरकत नाही.
पण सचोटीनं इतकी माया जमवता येतं नाही.
मग फसवा फसवी लुट लुबाडुन घेणं.खुन मारामा-या सगळेच अवैध प्रकार करावेच लागतात.
त्रिशुल सिनेमातलं वाक्य आठवलं."
" कोई भी आदमी अमिर बननेसे पहले 
कोई ना कोई बेईमानी जरुर करता है""
खरय ते.आणि श्रीमंत कोणाला म्हणायचं? 
खुप पैसा असणा-याला?
की भरपुर गाड्या असणा-याला? 
की खुप जमिन प्रॉपर्टी असणा-याला?
पण मग हे सगळ ज्यांच्याकडे आहे ते सुखानं झोपतात? टेंशन फ्री आहेत? तर नाही.
ते सामान्यांपेक्षा जास्तच टेंशन मधे जगतात.
मग तुकाराम महाराज आठवतात.
रामदास स्वामी.ज्ञानेश्वर ही मंडळी आठवतात.
धन, धान्य,दागीने,पैसा काहीच न्हवतं पण करोडो माणस होती मागे.त्यांचे अश्रु पुसत होते ते.ती माणसं ही श्रीमंती होती.म्हणुनतर ५०० वर्षानंतरही त्यांचीच पालखी निघते.एकाही तथाकथीत श्रीमंताची निघत नाही.
पण हे संत शिकवलेच नाहीत आपल्याला.
हसत हसत फासावर केवळ देशासाठी लटकणारे क्रांतीकारक शिकवलेच नाहीत.
म्हणुन हा प्रॉब्लेम झालाय.
ह्यांचे संस्कार वेळीच झाले असते.
तर वेगळी पिढी पहायला मिळाली असती.
पण ते नाही झालं.
पैसा हेच आपल्या शिक्षणाचं अंतिम ध्येय बनवल गेलं.
त्यातुनच हा पैसा जमवायची सवय लागली.
पण अजुनही वेळ गेलेली नाही.
पालकांनी लक्ष्मी पेक्षा सरस्वतीची पुजा करायला मुलांना शिकवल पाहीजे.
सरस्वती मागोमाग लक्ष्मी येणारच.पण लक्ष्मी मागोमाग सरस्वती नाही येत.असो.
ह्यातुन काहीतरी शिकलं पाहिजे.
शिकावं.असं वाटतं.असो.
परमेश्वर सर्व श्रीमंतांना बुध्दीदेवो.
पालकांना सरस्वतीची उपासना करायला 
मुलांना शिकवण्याची बुध्दी देवो.
भारत माता की जय.
-शरद पोंक्षे.
११ नोव्हे.अर्थात २० कार्तिक १९३८

सर्व पहा

कबीर खानच्या चित्रपटाच्या सेटवर कार्तिक आर्यन जखमी, गुडघ्याच्या शस्त्रक्रिया होणार

कार्तिक आर्यनने स्वतःची निर्मिती संस्था, डोपामाइन स्टुडिओ सुरू केली

विमल वेलचीच्या जाहिरातीवरून मुकेश खन्ना संतापले, शाहरुख आणि अजय देवगण यांना माफी मागण्यास सांगितले

राजपाल यादवने ₹१,२०० कोटी किमतीचा करार केला; अभिनेता १२ चित्रपटांमध्ये काम करणार

अभिनेता रणवीर सिंग ने 'प्रलय'च्या चित्रीकरणाला सुरुवात केली

सर्व पहा

रक्षाबंधन निमित्त लाडक्या बहिणीला फिरायला घेऊन जा मुंबईच्या या निसर्गरम्य ठिकाणी

पद्मश्री पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ अभिनेत्री सौकार जानकी यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन

मराठी अभिनेत्री वनिता खरात एका मोठ्या ऑनलाइन घोटाळ्याची बळी ठरली

हिंदू-मुस्लिम विचारसरणीतून बाहेर पडा...'; शर्मिला टागोर यांच्या 'वंदे मातरम' वक्तव्यावर कंगना रणौतचा घणाघात!

गोविंदाला 'चिची' हे नाव कसे मिळाले? याचे कारण खुद्द सुनीता आहुजा यांनी स्पष्ट केले, जुने वक्तव्य समोर आले

पुढील लेख
Show comments