Dharma Sangrah

दृष्टिकोण

ऋचा दीपक कर्पे
"काय ही आजकालची मुलं! तरुण वयातच ह्यांची गुडघी काय दुखतात, कंबर काय अखडते! सकाळी उठून भराभरा कामाला लागायचं ते तर कुठेच गेलं...सतत बाम चोळत राहतात नि गोळ्या खात राहतात. तरी आमच्यासारखी कबाडकष्ट करावी लागली नाहीत. न धुणं न भांडी न केरवारा.." बागेत बाकावर बसल्येल्या आजीबाई आजोबांसोबत बोलत होत्या."
 
अगं काळ बदलत चालला आहे. आजकालची मुलं मेहनतीची कामं कमी करतात. त्यांचं जीवन यांत्रिक झालं आहे. सगळ्या कामांसाठी मशीनी आहेत. पायी चालायला नको, जीने चढा-उतरायला लिफ्ट असते. एक बटण दाबलं की सारी कामं होतात. सादा टीव्ही चा आवाज जरी वाढवायचा असेल तरी रिमोट आहे!!" आजोबा उत्तरले."
 
हो न! आपण निदान तो लैंड लाईन फोन वाजला की कसे धावात जायचो ..आता तर चोविस तास तो मोबाईल हातातच असतो." 
 
"सारं जग रिमोट मय झालंय. काही वर्षानंतर तर लोकं एका जागेवरून हलणार सुद्धा नाही, सारे काम बसल्या जागेवरूनच करतील का कोण जाणे!!" आजोबांच्या बोलण्यात एक काळजी होती.
  
त्याच बागेत व्हीलचेअर वर फिरायला आलेली ती मात्र हा संवाद ऐकून सुखावली. एक सोप्पं आणि आत्मनिर्भर भविष्य तिच्या डोळ्यात तरंगत होते. 
 
©ऋचा दीपक कर्पे

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

लहान मुलांना संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी एक जबरदस्त पर्याय Semolina Cheese Corn Appay Recipe

उष्माघाताचा त्रास झाला आहे? हे फळ खाल्ल्याने शरीराला मिळेल त्वरित आराम

एअरलाइन इंडस्ट्रीत करिअर करायचे आहे? MBA in Air Travel Management बद्दल सर्व काही जाणून घ्या

तजेलदार आणि चमकदार त्वचेसाठी किवीचा वापर करा; जाणून घ्या खास फायदे

पद्मश्री मालती जोशी यांच्या स्मरणार्थ आयोजित 'स्मृती कल्प' कार्यक्रमांतर्गत साहित्य आणि चित्रपटसृष्टीतील मान्यवर इंदूरमध्ये एकत्र येणार

पुढील लेख
Show comments