Festival Posters

Kitchen Tips: कालवणात मीठ जास्त झाले का? अवलंबवा या ट्रिक

शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024 (14:00 IST)
बऱ्याचदा स्वयंपाक करताना काहीवेळेस भाज्यांमध्ये खूप मीठ घातले जाते. अशा परिस्थितीत त्या भाजीची चव देखील खराब होते. तसेच अश्यावेळेस अनेकांना प्रश्न पडतो की, काय करावे? तर आज आपण काही ट्रिक पाहणार आहोत ज्यामुळे कालवणात जास्त झालेले मीठ नक्कीच कमी करता येईल. व पदार्थ वाया जणार नाही. तर चला जाणून घ्या ट्रिक.  
 
व्हिनेगर किंवा लिंबाचा रस-
पदार्थामध्ये वाढलेले मीठ आंबट चव घालून संतुलित करता येते. याकरिता भाजीमध्ये एक ते दोन  चमचे व्हिनेगर किंवा एक चमचा लिंबाचा रस घालावा. ज्यामुळे नक्कीच फायदा होईल. 
 
बटाटा-
अनेक वेळेस बनवलेल्या भाजीमध्ये मीठ जास्त पडते. अशा परिस्थितीत एका बटाट्याचे दोन तुकडे करून भाजीमध्ये घालावे. बटाटा भाजीतील अतिरिक्त मीठ शोषून घेतो. व भाजीची चव देखील बिघडत नाही. 
 
साखर किंवा मध- 
भाजीमध्ये किंवा कोणत्याही कालवणात मीठ जास्त झाल्यास भाजीमध्ये थोडी साखर आणि मध घालावे. पण जास्त प्रमाणात घालू नये. नाहीतर भाजीची चव गोड होऊ शकते.
 
पीठ-
भाजीमध्ये मीठ जास्त झाल्यास मळलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून भाजीत घालावे. पिठाचे गोळे भाजीत मीठ नियंत्रित करतात. व पिठाच्या गोळ्यांनी रस्साही घट्ट होतो.
 
बेसन- 
कालवणात मीठ जास्त प्रमाणात पडल्यास 1 चमचा हलके भाजलेले बेसन घालावे. मीठ संतुलित करते. तसेच रसाळ भाज्यांमध्ये बेसनाचा वापर करावा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

घरच्या घरी हॉटेलसारखा कुरकुरीत म्हैसूर डोसा; लिहून घ्या रेसिपी

पावसाळ्यात ताप आला तर डेंग्यू की व्हायरल? ओळख कशी कराल?

बारावीनंतर डिप्लोमा इन कॉम्प्युटर इंजिनीअरिंग करा! लाखोंच्या पगाराच्या नोकरीची संधी

पावसाळ्यात कच्च्या दुधाने करा त्वचेची काळजी, चेहरा दिसेल उजळ आणि तजेलदार

भिजल्यानंतर लगेच आंघोळ करावी का? डॉक्टर काय सांगतात?

पुढील लेख
Show comments