Festival Posters

बीएमसी प्रशासनाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासोबत संयुक्तपणे ठोस पावले उचलली

Updated: मंगळवार, 31 डिसेंबर 2024 (11:01 IST)
 
मिळालेल्या माहितनुसार प्रदूषण रोखण्यासाठी बीएमसी प्रशासनाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासोबत संयुक्तपणे ठोस पावले उचलली आहे. सोमवारी बीएमसी मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत आयुक्त भूषण गगराणी म्हणाले की, प्रदूषण पसरवल्याप्रकरणी कोळसा आणि लाकडावर चालणाऱ्या 77 बेकरी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच, 41 लाकूड आधारित स्मशानभूमी पीएनजी आणि विजेमध्ये रूपांतरित करण्यात आली आहे. मुंबईतील 225 स्मशानभूमींचे वीज आणि पीएनजीमध्ये रूपांतर करण्याची प्रक्रियाही सुरू आहे.
 
सार्वजनिक वाहतूक सेवा पर्यावरणपूरक बनवण्यासाठी 2100 सिंगल डेकर आणि 200 डबल डेकर इलेक्ट्रिक बसेसचा लवकरच बेस्टच्या ताफ्यात समावेश करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच हवेच्या गुणवत्तेचे परीक्षण करण्यासाठी एमएमआर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, वसई-विरार, पालघर, कल्याण आणि भिवंडी येथे विविध ठिकाणी एकूण 45 हवेच्या गुणवत्तेची देखरेख यंत्रे बसवण्यात आली आहे .  

Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

LIVE: रोहित पवार यांनी तुकाराम मुंडे यांना निवेदन देत परीक्षा रद्द करण्याची आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली

भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिका कधी सुरू होईल? संपूर्ण वेळापत्रक पहा

किसान कर्जमुक्ती योजना २०२६ च्या लाभार्थ्यांची यादी जाहीर, भंडारा जिल्ह्यातील २२,३६५ शेतकरी पात्र

दिल्ली आणि महाराष्ट्रासह १८ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा

रोहित पवार यांचे तुकाराम मुंडे यांना निवेदन; पेपरफुटीची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी

पुढील लेख
Show comments