Dharma Sangrah

भंडारा अपघातावर देवेंद्र फडणवीसांनी शोक व्यक्त केले,पटोले यांनी सरकारवर साधला निशाणा

शुक्रवार, 24 जानेवारी 2025 (15:18 IST)
भंडारा जिल्ह्यात एका आयुध निर्माणीमध्ये आज सकाळी भीषण स्फोट झाला असून या अपघातात 5 कर्मचाऱ्यांचा मृत्यु झाला. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थली दाखल झाल्यासून बचावकार्य सुरु झाले आहे. या मध्ये आता पर्यन्त पाच  कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. 
 
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीसांनी  या भीषण अपघातावर शोक व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विटरवर ट्वीट करूं शोक व्यक्त करून मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे तसेच जखमींच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
ALSO READ: भंडारा येथील ऑर्डिनन्स फॅक्टरीत स्फोट, 5 जणांचा मृत्यू
त्यांनी ट्विटरवर लिहिले की, “भंडारा जिल्ह्यातील आयुध निर्माणीतील स्फोटानंतर छत कोसळल्याने 13 ते 14 कामगार अडकल्याची माहिती आहे. त्यातील पाच जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक घटनास्थळी असून सर्व प्रकारची मदत केली जात आहे. एसडीआरएफ आणि नागपूर महानगरपालिकेच्या पथकांनाही बचाव कार्यासाठी पाचारण करण्यात आले असून ते लवकरच पोहोचतील.”
 
या घटनेची माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, “जिल्हा प्रशासन संरक्षण दलांच्या समन्वयाने बचाव कार्यात गुंतले आहे. वैद्यकीय मदतीसाठी पथकेही सज्ज ठेवण्यात आली आहेत. आतापर्यंत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या घटनेत एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो.”
या अपघातावर नाना पटोले यांनी मोदी  सरकारवर घणाघात केला आहे.त्यांनी याला मोदी सरकारला जबाबदार ठरवले आहे. मोदी सरकारचे हे अपयश असल्याचे ते म्हणाले.  
Edited By - Priya Dixit 
 

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्राच्या १७ विधान परिषद जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ तीन दिवस शिल्लक

तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रात पतंजलीच्या दिव्या फार्मसीवर छापा, लाखो रुपयांची औषधे जप्त

वनतारा पुन्हा न्यायालयाच्या परीक्षेत यशस्वी, सर्वोच्च न्यायालयाने नवी याचिका फेटाळली

फुगेवाडी (पिंपरी-चिंचवड) विषारी दारूकांडातील ४ मुख्य आरोपींना ८ जून पर्यंत पोलीस कोठडी

एक्सप्रेसवर दगडफेक केल्यास आता कारवाई होणार; रेल्वे आकाशातून निगराणी करणार

पुढील लेख
Show comments