मृत भाविक उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, राजस्थान, हरियाणा आणि मध्य प्रदेशातील आहेत. ही बस जम्मू-काश्मीर परिवहन महामंडळाची होती. जम्मू येथून ३,६०३ यात्रेकरूंना घेऊन निघालेल्या ताफ्यात ही बस होती. पोलीस, लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी स्थानिकांच्या मदतीने मदत, बचाव कार्य केले आणि दरीतून मृतदेह व जखमींना वर आणले, असे असे वरिष्ठ पोलीस अधीक्षक मोहन लाल यांनी सांगितले.