चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले होते. तर दोन जवान हुतात्मा झाले होते. आणखी दोन दहशतवादी मारले गेले तर एक जवान शहीद झाला. दोन दिवस चाललेल्या या चकमकीत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. या मोहिमेत लष्कराच्या तीन जवानांना हौतात्म्य आले. नियंत्रण रेषेवर शोधमोहीम सुरू आहे. चकमकीच्या ठिकाणी चार शस्त्रे आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या.