Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

डीआरडीओने बनवले देशातील सर्वात हलके बुलेट प्रूफ जॅकेट

Updated: बुधवार, 24 एप्रिल 2024 (12:18 IST)
 
देशातील सर्वात हलके बुलेट प्रूफ जॅकेट पॉलिमर बँकिंग आणि मोनोलिथिक सिरेमिक प्लेटने बनले आहे.  या जॅकेटला 6 स्नाइपर गोळ्या देखील भेदू शकणार नाही. रक्षा मंत्रालयने सांगितले की, जॅकेटचे इनकंजक्शन (ICW) आणि स्टॅन्डअलोन डिजाईन सैनिकांना 7.62×54 RAPI (BIS 17051 चे लेव्हल 6) गोळा-बारूदपासून सुरक्षा प्रदान करतील. जॅकेटला कानपुरमध्ये असलेले DRDO चे रक्षा साहित्य आणि भंडार अनुसंधान आणि विकास प्रतिष्ठान (DMSRDE) यांनी तयार केले आहे. जॅकेटची TBRL चंदीगड मध्ये BIS 17051-2018 च्या व्दारा टेस्टिंग केले गेली. 
 
DRDO द्वारा बनवली गेलेली हल्‍की बुलेट प्रूफ जॅकेटला मोठे यश सांगितले जात आहे. असलेल्या वेळेमध्ये जवान ज्या बुलेट प्रूफ जॅकेटच्या उपयोग करतात, त्याचे वजन जास्त आहे. यामुळे सैनिकांना क्रिटिकल ऑपरेशनच्या दरम्यान अतिरिक्‍त ओझे उचलावे लागते. आता त्यांना यांपासून अराम मिळू शकतो. रक्षा विभागचे मूलभूत आणि विकास सचिव आणि डीआरडीओ अध्यक्षने हलके बुलेट प्रूफ जॅकेटला तयार केल्यावर DMSRDE ला अभिनंदन केले. 
 
रक्षा मंत्रालयने सांगितले की, एर्गोनॉमिक पद्धतीनेने डिजाइन केले गेलेले फ्रंट हार्ड आर्मर पॅनल(HAP) पॉलिमर बँकिंग आणि मोनोलिथिक सिरेमिक प्लेट पासून बनलेले आहे. ऑपरेशन दरम्यान घातलेल्या सैनिकांसाठी पहिल्यापेक्षा जास्त आरामदायक आणि सुरक्षित राहील. मंत्रालयने माहिती दिली की, ICW हार्ड आर्मर पॅनल (HAP) ची एरियल डेंसिटी 40 kg/M2 आणि स्टॅन्डअलोन HAP ची एरियल डेंसिटी 43kg/M2 पेक्षा कमी आहे. 
 
भारतीय सेनेचे प्रमुख जनरल मनोज पांडे नवी दिल्ली मध्ये ऑल इंडिया मॅनेजमेन्ट एसोसिएशन (एआईएमए) चे नववे नॅशनल लीडरशिप कॉन्क्लेव मध्ये पोहचले होते. त्यांनी डिफेंस सेक्टर मध्ये आत्मनिर्भरताचे महत्व याबद्दल चर्चा केली. जनरल पांडे म्हणाले की, आताच्या घडलेल्या जियो-पॉलिटिकल (भू-राजनीतिक) घटनाक्रमांनी दर्शवले आहे की, जिथे राष्ट्रीय हिताचा प्रश्न आहे, देश युद्धमध्ये जाण्यासाठी डगमगणार नाही. सैन्य ताकद युद्धला थांबवणे आणि त्याचे निवारण करण्यासोबत गरज पडल्यावर हल्ल्याचा मजबुतीने ऊत्तर देईल आणि युद्ध जिकंण्यासाठी गरजेचे आहे.

Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments