Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

देशाचे सात वीरपुत्र शहीद

Updated: बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 (09:51 IST)
 
यामध्ये आपल्या राज्यातील 35 वर्षीय संभाजी यशवंत कदम हे नांदेड जिल्ह्यातील जानापुरी गावचे आहेत. तर दुसरे वीरपुत्र  वर्षांचे मेजर कुणाल गोसावी हे पंढरपूरचे आहेत. जम्मू काश्मीरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून दहशतवाद्यांशी चकमक सुरु आहे. पोलिसांच्या वेशात शिरलेल्या काही दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सात जवान शहीद झाले.
 
मंगळवारी सकाळी जम्मूच्या उपनगराबाहेर असलेल्या 166 क्रमांकाच्या युनिटवर 3 ते 4 दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यानंतर भारतीय जवानांनीही हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं. ज्यात 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. मेजर कुणाल गोसावी नऊ वर्षांपूर्वीच सैन्यात दाखल झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी उमा, मुलगी आणि दोन भाऊ आहेत. 
 
काश्मीरमधल्या उरीमध्ये लष्करी तळावर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात 19 जवान शहीद झाले होते. त्यानंतरचा हा सर्वात मोठा अतिरेकी हल्ला आहे.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

पुढील लेख
Show comments