suvichar

प्रियांका गांधी भाजपवर निशाणा साधत म्हणाल्या वायनाडमधील भूस्खलनाच्या घटनेचे राजकारण केले

मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024 (09:39 IST)
काँग्रेस सरचिटणीस आणि वायनाड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्रियांका गांधी यांनी सोमवारी आरोप केला की भारतीय जनता पक्ष या वर्षी जुलैमध्ये झालेल्या भूस्खलनाच्या घटनेचे राजकारण करत आहे. 
 
या नैसर्गिक आपत्तीत शेकडो लोक मरण पावले आणि अनेक लोक बेघर झाले. निवडणूक प्रचाराच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात करताना त्यांनी सुलतान बथेरी विधानसभा मतदारसंघातील केनिचिरा येथे एका पथसभेला संबोधित केले.त्या म्हणाल्या की, "ज्या आपत्तीमुळे लोकांचे प्रचंड हाल झाले, त्याचेही राजकारण भाजपने केले आहे. आम्ही अशा ठिकाणी उभे आहोत, जिथे तुम्हाला तुमचा देश, तुमच्या गरजा आणि तुम्हाला हव्या असलेल्या राजकारणाचा विचार करावा लागेल."  
 
मिळालेल्या माहितीनुसार भाजपवर निशाणा साधत प्रियंका म्हणाल्या की, देशभरात द्वेष पसरवणाऱ्या भाजपच्या राजकारणाचे वैशिष्ट्य म्हणजे राग, फूट आणि विनाश. तसेच जनतेसमोरील खऱ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असून त्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत, असे त्या म्हणाल्या. प्रियंका गांधी म्हणाल्या की, भाजपच्या राजकारणाचा उद्देश केवळ तुमच्या समस्यांवरून तुमचे लक्ष वळवणे हा आहे, कारण कितीही किंमत मोजावी लागली तरी सत्तेत राहणे हाच एकमेव उद्देश आहे.

Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

पुढील लेख
Show comments