राष्ट्रीय हरित लवादाच्या संमतीनंतरच या पुतळ्याचे काम सुरु केले जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भात लवादासोबत अद्याप कोणताही पत्रव्यवहार करण्यात आलेला नाही अशीही माहिती समोर येते आहे. अयोध्येचा विकास करण्यासंदर्भातील प्रकल्पाचा १९५.८९ कोटींचा आराखडा उत्तर प्रदेश राज्य सरकारने केंद्राकडे पाठवला आहे. ज्यापैकी १३३.७० कोटींचा निधी केंद्राने राज्याला दिला आहे.