suvichar

पाच रूपयात वरण-भात, भाजी-पोळी आणि पापड

उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सत्तेवर आल्यापासून नवनवीन निर्णय घेण्याचा धडाका लावल्याचे दिसत आहे. आता ते राज्यातील वंचित व आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्यांसाठी 5 रूपयांत भरपेट जेवण देण्याचा विचार करत आहेत. 
 
या 5 रूपयांच्या थाळीत भात, चपाती, डाळ, एक भाजी आणि पापड असेल. अनेकांना ऐकवेळचे जेवणही मिळत नाही, अशांसाठी हा दिलासादायक निर्णय असेल, असे मत उत्तर प्रदेशाचे दुग्धविकास व सांस्कृतिक मंत्री लक्ष्मीनारायण चौधरी यांनी मांडले.
 
याबाबत अधिक माहिती देताना चौधरी म्हणाले, मी नुकताच छत्तीसगड येथे दौर्‍यावर गेला होता. त्यावेळी मी तेथील सरकारकडून देण्यात येत असलेल्या 5 रूपयांत मिळणार्‍या थाळीचा आस्वाद घेतला. मी तेथे असताना अनेकवेळा 5 रूपयांत जेवण केले. ते अन्न खूप स्वच्छ, चांगले आणि चवदार होते. मी तेथील स्वच्छतेवरही खूप समाधानी आहे, असे कौतुकही त्यांनी केले.

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

पुढील लेख
Show comments