Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कुमार महाराष्ट्र केसरी पैलवानाचा व्यायाम करताना मृत्यू

Updated: बुधवार, 4 डिसेंबर 2024 (21:46 IST)
 
कुमार महाराष्ट्र केसरी, ब्रॉंझ पदक, आदर्श व गुणी खेळाडू असे अनेक किताब पटकावलेल्या पैलवानाच्या 
अचानक मृत्यूमुळे शोककळा पसरली आहे. पैलवान पारखी यांचे १२ दिसंबर रोजी लग्न होते.त्या पूर्वीच काळाने झड़प घातली.
 
मुळशीतल्या माणगावचा भूमिपुत्र असलेल्या विक्रम पारखी यांनी कुमार महाराष्ट्र केसरी पदावर आपलं नाव कोरून मानाची गदा मिळवली होती. 28 नोव्हेंबर 2014 रोजी वारजे येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आयोजित “महाराष्ट्र राज्य कुमार अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा 2014”  झाली होती. त्यात विक्रम याने अजिंक्यपद मिळवले. विक्रम याने अनेक राष्ट्रीय पदकं व किताब मिळवले आहेत.
 
पैलवान विक्रम शिवाजीराव पारखी यांचा निधनाने गावात शोककळा पसरली आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय  स्तरावर कुस्ती स्पर्धेत सहभाग घेतले होते.त्यानी अनेक पदक आणि किताब मिळवले होते. त्यांनी अनेक विक्रम देखील आपल्या नावावर केले होते. 

झारखंडच्या रांची मध्ये त्यांनी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत  ब्रॉंझ पदक पटकावले होते. त्यांनी मुळशीतल्या माले केसरी स्पर्धेचा विजेता बनवून माले केसरी किताब व गदा मिळवली होती. अशा अनेक नामांकित कुस्ती स्पर्धेत माण गावचे आणि मुळशी तालुक्याचे नाव विक्रम पारखी याने उंचावले होते.हिंदकेसरी पैलवान अमोल बुचडे यांच्याशी त्याचे गुरू-शिष्याचे नाते होते. विक्रमचे वडील शिवाजीराव पारखी हे निवृत्त सैनिक असून त्यांनी 1999 कारगिल युद्धात सहभाग घेतला होता. विक्रम याच्यामागे आई, वडील, एक विवाहित भाऊ व एक बहीण असा परिवार आहे.
Edited By - Priya Dixit 
 

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्रात जंतर मंतरपेक्षाही मोठे आंदोलन होणार! काँग्रेसच्या खासदाराचा दावा

सर्वोच्च न्यायालयाने 'आर्ट ऑफ लिव्हिंग'ला यमुना नदीच्या पूरक्षेत्राचे पर्यावरणीय नुकसान केल्याच्या सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्त केले

भंगार उतरवताना वाहनाच्या डिझेल टाकीचा स्फोट होऊन दोन मुलांसह चार जणांचा मृत्यू

महिलांची ओळख केवळ पत्नी, मुलगी आणि आई एवढीच नाही... तर भारताची सर्वात मोठी ताकद; पुण्यात राहुल गांधी गरजले

गोंदियामध्ये १२६ मलेरियाचे रुग्ण आढळले; देवरीमध्ये एकाचा मृत्यू

पुढील लेख
Show comments