Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाविकास आघाडीच्या आमदारांची हॉटेल'वारी', महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग

Updated: सोमवार, 6 जून 2022 (16:26 IST)
 
आमदारांची हॉटेल'वारी'
शिवसेनेच्या आमदारांना बैठकीसाठी येताना हॉटेलमध्ये राहण्याच्या तयारीनीशी येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व आमदार एकाच ठिकाणी सुरक्षित आणि एकत्र रहावेत यासाठी शिवसेनेकडून आमदारांच्या राहण्याची व्यवस्था मुंबईतील हॉटेलमध्ये करण्यात आली आहे.
 
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनाही हॉटेलमध्ये शिफ्ट करणार का याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
 
दुसऱ्या बाजूला राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची आज मुंबईत बैठक पार पडली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यांनी बैठकीला ऑनलाईन हजेरी लावली.
 
राज्यसभेच्या निवडणुकीसाठीचं ब्लू प्रिंट तयार आहे अशी प्रतिक्रिया भाजपच्या बैठकीनंतर आमदार आशिष शेलार यांनी दिली. ते म्हणाले, "भाजपचा तिसरा उमेदवार निवडणुकीत नक्की जिंकेल आणि शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव होईलच. ज्यांना दररोज घोडेबाजाराचं स्वप्न पडतं ते तबेल्यात राहत असतील. आमदारांना नजरकैदेत ह्यांना ठेवावं लागतंय. आमदारांना नजरकैदेत ठेवण्याचं पाप करणारे लोक लोकशाहीबाबत बोलतात. आमदारांवर विश्वास नाही याचं हे लक्षण आहे. आमदारांचा एवढा अपमान कोणीही केला नसेल."
 
यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, "केंद्रीय यंत्रणांचा वापर या निवडणुकीत होतोय याचा पुरावा संजय राऊत यांच्याकडे आहे का. कदाचित पराभव समोर दिसत असल्याने कारण दिलं जात आहे. ज्यांचे पक्षीयस्वास्थ्य बिघडलं आहे."
 
काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी शेलारांना प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपने त्यांचे आमदार सांभाळावेत असं सतेज पाटील म्हणाले आहेत. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आमदारांचा घोडेबाजार होत असल्याच्या आरोपावर प्रतिक्रिया दिली आहे.
त्या म्हणाल्या, "राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार होत आहे. हे दुर्दैवी आहे. महाविकास आघाडीचे अनेक नेते भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना भेटले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला. मात्र दुर्दैव आहे की महाराष्ट्रात अनेक वर्षानंतर अशी गोष्ट होत आहे. ही कुठल्याही सुसंस्कृत राज्यासाठी चांगली बाब नाही."
 
मतदानासाठी कोर्टाकडे अर्ज
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करता यावं यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी ईडी कोर्टात अर्ज दाखल केला आहे. वकिलांमार्फत ईडी कोर्टात अर्ज दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणई ईडीने नवाब मलिक यांना अटक केली आहे. तसंच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासाठी अर्ज केला आहे. महाविकास आघाडीला राज्यसभा निवडणुकीसाठी प्रत्येक मत महत्त्वाचं असल्याने तुरुंगात असलेल्या नेत्यांनीही मतदानासाठी कोर्टाकडे विचारणा केली आहे.
या दोन्ही अर्जांवर 8 जूनला सुनावणी होणार आहे.
 
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी शेवटच्या पाच मिनिटाला मतदान करणार अशी भूमिका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी घेतली आहे. राज्य सरकारने धान आणि हरबऱ्याच्या अनुदानासाठी राज्य आणि केंद्र सरकारने निर्णय घ्यावा, अन्यथा याचा परिणाम राज्यसभा मतदानावर होईल असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदानाची संधी द्यावी यासाठी छगन भूजबळ पाठपुरावा करत आहेत अशी माहिती दिलीय.
 

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

LIVE: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय: पुणे आणि रत्नागिरी दरम्यान ६ गणेश चतुर्थी विशेष गाड्या धावणार

दिल्ली इमारत दुर्घटने प्रकरणी मोठी कारवाई, एमसीडीचे ५ अधिकारी निलंबित

डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यू मेक्सिकोचे नाव बदलून 'न्यू अमेरिका' ठेवण्याचा प्रस्ताव मांडला

१० मिनिटे, १०७ फटके आणि जागेवरच न्याय: लिव्ह-इन जोडीदाराच्या मारेकऱ्याला मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आल्याने खळबळ

६० दिवसांत केवळ १३ पोस्टस आणि फॉलोअर्स ३४.१५ लाख; तुकाराम मुंडेंनी महाराष्ट्रातील लोकप्रिय व्यक्तींना मागे टाकले

पुढील लेख
Show comments